शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 08:48 IST

आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं अभिमानाने सांगतेय नवदुर्गा संगीता रिठे.

पांडुरंग मरगजे 

धनकवडी : शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी शहराच्या या स्वच्छतेत कचरावेचक महिलांचेही तितकेच महत्त्वपुर्ण योगदान आहे. उदरनिर्वाहासाठी पती सोबत शहरात आलेल्या एका कचरा वेचक महिले ने स्वच्छतेचे वृत्त स्विकारले आणि त्या क्षणापासून आज तब्बल तीस वर्षे झाली उन वारा,पावसात सुद्धा ते वृत्त एक सेवा म्हणून अखंड चालू आहे शहर स्वच्छतेसाठी हयात घालवणार्या या नवदुर्गेचे नाव आहे संगीता रिठे..

दादासाहेब रिठे यांच्या बरोबर संगीता यांचा विवाह झाला. त्यांचे मुळ गाव बारामती तालुक्यातील काठेवाडी. विवाहानंतर रिठे परिवार उदरनिर्वाहा साठी पुणे शहरातील तळजाई वसाहत पद्मावती येथे दाखल झाले. दरम्यानच्या काळात संगीता रिठे यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कचरा गोळा करण्याच्या कामाला सुरुवात केली. त्याकाळात म्हणजे तीस वर्षांपूर्वी अवघा अडीच रुपये महिना मानधन संगीता यांना मिळत असे. आहे ते मिळविणे हि जिकिरीचे असायचे.

दरम्यान पतीच्या निधनानंतर हाच व्यवसाय एक वृत्त म्हणून स्विकारलेल्या संगीता यांनी आपल्या संपूर्ण परिवाराचा संभाळ केला. आज वयाची पन्नाशी ओलांडून हि संगीता त्याच उत्साहात कचरा गोळा कळण्याचं काम आजही करत आहेत. आजमितीला मुलगा, सून व नातवंडे असा तेरा जणांचा त्यांचा परिवार आहे. परिवारातील एक मुलगा सून नातवंडे मुळ गावी असून संगीता यांच्या बरोबर एक मुलगा, सून व नातवंडे असा नवजणां चा परिवार आहे. मुलगा आणि सून दोघेही कचरा वेचक म्हणूनच काम करत आहेत.

संगीता यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्या ने त्यांनी विवाहानंतर लगेचच कामाला सुरुवात केली होती. कधीतरी परिस्थिती सुधारेल या आशेनेच त्या मेहनत करत राहिल्या. आई वडि लांच्या कडे लहानपणा पासून काम करणार्या संगीता यांची लग्नानंतर तरी सुख पदरात पडेल अशी आशा होती. पण ती सुद्धा फोल ठरली. 

पती हि कचरा गोळा करण्याचे काम करत तेही कायमस्वरूपी नसल्याने त्यांना श्रीमंतीचे सुख कधी अनुभवताच आले नाही. परंतु याची खंत काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाही. सुरुवातीपासूनच आयुष्यात कष्टच लिहिलेले आहेत, त्याला कोण काय करणार असे संगीता सांगतात. रस्त्यावर एक महिला कचरा वेचताना पाहून त्यांना अनेकांनी हिणवले. एकाने म्हटलं सुद्धा की 'कष्ट करून काही व्हायचं नाही, नशिबात जे लिहिले आहे तेच होणार'. त्यावर खचून न जाता त्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘कदाचित नशिबात लिहिले असणार की कष्ट केल्यानेच सर्वकाही मिळेल.' संगीता चं हे वाक्य साधं सरळ असलं तरीया उत्तरातून बरंच काही शिकण्यासारखं आहे, हे विसरून चालणार नाही.

याशिवाय पूर्वीच्या खडतर आयुष्याच्या मानाने आजचं जगणं जरा बरं असलं तरी आपल्या आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं हि नवदुर्गा (संगीता रिठे) अभिमानाने सांगतात.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीSocialसामाजिकWomenमहिलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका