शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:20 AM

कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 

पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंबांकडे किमान काही साठा असतो. मात्र हातावर पोट असणारे त्याबाबत काहीच करू शकत नाहीत. त्यांचे या काळात बरेच हाल होणार आहेत. ते होऊ नयेत यासाठी त्यांना किमान दरात शिधापत्रिकेवर काही ऊपलब्ध होईल याची व्यवस्था सरकारने करावी. त्यातून त्यांना निदान खाण्यासाठी काहीतरी मिळेल. ही सुविधा तातडीने सुरू केलीत तर असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, छोटे व्यावसायिक व गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येणार नाही आणि ते राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरी थांबू शकतील. त्याचा फायदा साथ थांबण्यासाठी होऊ शकेल असे किर्दत म्हणाले. समाजातील एक मोठा वर्ग या बंदीत होरपळून निघत आहे. घरात काही खायला नसेल तर मोठ्यांसह मुलाबाळांचेही हाल होतात. त्यांना सहजपणे अन्नधान्य ऊपलब्ध झाले तर ते किमान आपला स्वाभिमान टिकवून ठेवू शकतील. त्यामुळे सरकारने त्वरीत यात लक्ष घालावे अशी मागणी किर्दत यांनी केली. पुण्यातच असे काही लाख लोक असून ते सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAam Admi partyआम आदमी पार्टी