शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

लॉकडाऊन काळातले 'अन्नदाते'; पुणे शहरातील भुकेलेल्यांच्या पोटाला मिळतोय दोन घासांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:31 IST

पोलिसांचा नियमित जाच सहन करूनही करतात पुण्यकर्म..

ठळक मुद्देविद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत

राजू इनामदारपुणे: कोरोना टाळेबंदीत पोलिसांचा जाच सहन करूनही शहरातील काही खानावळचालक गरजवतांना नियमित जेवण देण्याचे काम करत आहेत. विद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग होत आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. पेईंग गेस्ट म्हणून ते रहात असतात. टाळेबंदीत त्यांच्यातील अनेक जण पुण्यातच अडकले. त्याशिवाय घरी स्वयंपाक करता येत नाही असे व्रुद्धही अनेक आहेत. अशा सर्वांची दोन वेळच्या जेवणाची सोय करणार्या अनेक खानावळी पुण्यात आहेत.बहुसंख्य खानावळी या घरगुती असून महिलांकडूनच चालवल्या जातात. टाळेबंदीतही आपल्या सदस्यांची गरज म्हणून त्यांच्यातील काहींनी खानावळ सुरू ठेवली आहे.डबा भरून देणे किंवा मग जागा असेल तर टेबल खुर्ची टाकून तिथेच व्यवस्था करण्यात येते. दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत मिळते. दोन वेळच्या जेवणाचे दरमहाचे अनेक ग्राहक या खानावळ चालकांकडे आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असून त्यातल्या काही खानावळी तर २५ ते ३० वर्षांपासूनच्या आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने पुण्यात रोज येणार्यांची, त्यातल्या इथेच राहणार्यांची संख्या काही लाखात आहे. त्यातल्या काही हजारांची जेवणाची सोय याच खानावळींमधून होत असते.कोरोना टाळेबंदीची कुऱ्हाड याही व्यवसायावर कोसळली. त्यांचाही व्यवसाय बंद झाला, मात्र त्यामुळे त्यांच्या जेवणावर अवलंबून असलेल्यांची ऊपासमार होऊ लागली. त्यामुळे अनेक महिलांंनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. दत्तवाडीतच अशा चार खानावळी आहेत. विद्यार्थी वर्ग राहण्याचे प्रमाण नवी पेठ, दांडेकर पूल या भागात जास्त आहे. तिथेही अशा खानावळी आहेत. त्याशिवाय कर्वे रस्ता परिसरातही काहींनी डबा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.यातल्या बहुतेकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे दर वाढवलेले नाहीत. टाळेबंदीच्या आधी होते तेच दर कायम ठेवले आहेत. 

दर जूनेचटाळेबंदीत धान्य, रोजचा भाजीपाला यांचे भाव वाढले, मात्र आमचे मेंबर नेहमीचे असल्याने आम्ही दर वाढवले नाहीत. घरचेच लोक स्वयंपाक करत असल्याने मजूरी द्यावी लागत नाही. त्यामुळे परवडते.अमित माने, श्रावणी खानावळ ----/गरजूंची भूक भागवण्यात आनंदपोलिसांचा त्रास होतो, पण त्यापेक्षा गरजूंना डबा देता येतो याचा आनंद जास्त आहे. अनेकांची अडचण असते. वयामुळे स्वयंपाक होत नाही. त्यांंना आम्ही नियमीत डबा देतो. -- शंकर गिरी. बालाजी खानावळ..........//खानावळीमुळेच राहणे शक्यमी रहायला देहूरोडला आहे. अभ्यासासाठी म्हणून पुण्यात एकटाच राहतो आहे. खानावळ सुरू असल्यामुळेच इथे एकटे राहणे शक्य होत आहे.-- ऊदय महाले, विद्यार्थी...../(३२७)

 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसStudentविद्यार्थी