शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लॉकडाऊन काळातले 'अन्नदाते'; पुणे शहरातील भुकेलेल्यांच्या पोटाला मिळतोय दोन घासांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:31 IST

पोलिसांचा नियमित जाच सहन करूनही करतात पुण्यकर्म..

ठळक मुद्देविद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत

राजू इनामदारपुणे: कोरोना टाळेबंदीत पोलिसांचा जाच सहन करूनही शहरातील काही खानावळचालक गरजवतांना नियमित जेवण देण्याचे काम करत आहेत. विद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग होत आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. पेईंग गेस्ट म्हणून ते रहात असतात. टाळेबंदीत त्यांच्यातील अनेक जण पुण्यातच अडकले. त्याशिवाय घरी स्वयंपाक करता येत नाही असे व्रुद्धही अनेक आहेत. अशा सर्वांची दोन वेळच्या जेवणाची सोय करणार्या अनेक खानावळी पुण्यात आहेत.बहुसंख्य खानावळी या घरगुती असून महिलांकडूनच चालवल्या जातात. टाळेबंदीतही आपल्या सदस्यांची गरज म्हणून त्यांच्यातील काहींनी खानावळ सुरू ठेवली आहे.डबा भरून देणे किंवा मग जागा असेल तर टेबल खुर्ची टाकून तिथेच व्यवस्था करण्यात येते. दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत मिळते. दोन वेळच्या जेवणाचे दरमहाचे अनेक ग्राहक या खानावळ चालकांकडे आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असून त्यातल्या काही खानावळी तर २५ ते ३० वर्षांपासूनच्या आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने पुण्यात रोज येणार्यांची, त्यातल्या इथेच राहणार्यांची संख्या काही लाखात आहे. त्यातल्या काही हजारांची जेवणाची सोय याच खानावळींमधून होत असते.कोरोना टाळेबंदीची कुऱ्हाड याही व्यवसायावर कोसळली. त्यांचाही व्यवसाय बंद झाला, मात्र त्यामुळे त्यांच्या जेवणावर अवलंबून असलेल्यांची ऊपासमार होऊ लागली. त्यामुळे अनेक महिलांंनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. दत्तवाडीतच अशा चार खानावळी आहेत. विद्यार्थी वर्ग राहण्याचे प्रमाण नवी पेठ, दांडेकर पूल या भागात जास्त आहे. तिथेही अशा खानावळी आहेत. त्याशिवाय कर्वे रस्ता परिसरातही काहींनी डबा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.यातल्या बहुतेकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे दर वाढवलेले नाहीत. टाळेबंदीच्या आधी होते तेच दर कायम ठेवले आहेत. 

दर जूनेचटाळेबंदीत धान्य, रोजचा भाजीपाला यांचे भाव वाढले, मात्र आमचे मेंबर नेहमीचे असल्याने आम्ही दर वाढवले नाहीत. घरचेच लोक स्वयंपाक करत असल्याने मजूरी द्यावी लागत नाही. त्यामुळे परवडते.अमित माने, श्रावणी खानावळ ----/गरजूंची भूक भागवण्यात आनंदपोलिसांचा त्रास होतो, पण त्यापेक्षा गरजूंना डबा देता येतो याचा आनंद जास्त आहे. अनेकांची अडचण असते. वयामुळे स्वयंपाक होत नाही. त्यांंना आम्ही नियमीत डबा देतो. -- शंकर गिरी. बालाजी खानावळ..........//खानावळीमुळेच राहणे शक्यमी रहायला देहूरोडला आहे. अभ्यासासाठी म्हणून पुण्यात एकटाच राहतो आहे. खानावळ सुरू असल्यामुळेच इथे एकटे राहणे शक्य होत आहे.-- ऊदय महाले, विद्यार्थी...../(३२७)

 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसStudentविद्यार्थी