शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ही परदेशातली नदी नाही बरं का आपली मुळा मुठाच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 14:13 IST

सांडपाण्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये फेस : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देपुरामुळे स्वच्छ झाल्यानंतर पुणे, चिंचवडचा मैला थेट नदीपात्रात आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी पुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे

लोणी काळभोर : पावसाने या वर्षी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुळा- मुठेला अनेकदा पूर आला. यामुळे नदीतील जलपर्णी, घाण आणि दूषित पाणी वाहून गेले. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रसायने आणि मैलायुक्त दूषित पाणी पुन्हा नदीत आल्याने या दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा दूषित झाले आहे.   ज्या गावची नदी स्वच्छ, त्या गावाचे आरोग्य चांगले, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मुळा-मुठा नदी हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते, याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे पालिकेला शक्य होते. तेथील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवणेही गरजेचे असताना तसे घडले नाही. उलट, तेथील वस्त्या आहे तिथेच राहिल्या. नदीत बांधकामांचा राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाणही वाढत गेले. त्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही.मध्यंतरी नदीपात्रातून जाणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय हरित लवादाने आक्षेप घेतल्यावर तो काढून टाकावा लागला. याच लवादाने आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. न्यायालयाचा बडगा आल्याशिवाय आपल्याकडे कोणतेही काम सरकारी पातळीवर होत नाही, हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही येत आहे.कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी नाही, तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. कारण, मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर व नदीनजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या वाढत्या तक्रारींमागील एक महत्त्वाचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. या नदीकडे गेल्या पाच-साडेपाच दशकांत दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती बिकट झाली आहे. मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील अनेक जलचर प्रजाती नष्ट झाल्या आहेत. .... उजनी धरणातही दूषित पाणीपुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. परंतु, ती नावालाच असल्याने पाणी जसेच्या तसे नदीत येते. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. पुढे हेच पाणी उजनी धरणातून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते...........

नदीतीरावर असलेल्या गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. यामुळे त्यांना काहीच दोष नसताना गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा इत्यादी आजारांसह पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

3यामुळे ‘पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची?’ असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे. ...

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण