शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ही परदेशातली नदी नाही बरं का आपली मुळा मुठाच आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 14:13 IST

सांडपाण्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये फेस : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देपुरामुळे स्वच्छ झाल्यानंतर पुणे, चिंचवडचा मैला थेट नदीपात्रात आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी पुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे

लोणी काळभोर : पावसाने या वर्षी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुळा- मुठेला अनेकदा पूर आला. यामुळे नदीतील जलपर्णी, घाण आणि दूषित पाणी वाहून गेले. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रसायने आणि मैलायुक्त दूषित पाणी पुन्हा नदीत आल्याने या दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा दूषित झाले आहे.   ज्या गावची नदी स्वच्छ, त्या गावाचे आरोग्य चांगले, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मुळा-मुठा नदी हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते, याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे पालिकेला शक्य होते. तेथील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवणेही गरजेचे असताना तसे घडले नाही. उलट, तेथील वस्त्या आहे तिथेच राहिल्या. नदीत बांधकामांचा राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाणही वाढत गेले. त्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही.मध्यंतरी नदीपात्रातून जाणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय हरित लवादाने आक्षेप घेतल्यावर तो काढून टाकावा लागला. याच लवादाने आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. न्यायालयाचा बडगा आल्याशिवाय आपल्याकडे कोणतेही काम सरकारी पातळीवर होत नाही, हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही येत आहे.कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी नाही, तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. कारण, मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर व नदीनजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या वाढत्या तक्रारींमागील एक महत्त्वाचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. या नदीकडे गेल्या पाच-साडेपाच दशकांत दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती बिकट झाली आहे. मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील अनेक जलचर प्रजाती नष्ट झाल्या आहेत. .... उजनी धरणातही दूषित पाणीपुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. परंतु, ती नावालाच असल्याने पाणी जसेच्या तसे नदीत येते. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. पुढे हेच पाणी उजनी धरणातून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते...........

नदीतीरावर असलेल्या गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. यामुळे त्यांना काहीच दोष नसताना गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा इत्यादी आजारांसह पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

3यामुळे ‘पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची?’ असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे. ...

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण