शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांचे जोड नीट करणार

By admin | Updated: April 14, 2017 04:32 IST

शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू

पुणे : शहरातील अनेक उड्डाणपुलांचे जोड खराब झाले असून, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच या जोडदुरुस्तीची मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यात पुलांचीही तपासणी होणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ही माहिती देण्यात आली.राजाराम पूल, गरवारे महाविद्यालयाशेजारचे एस. एम. जोशी व स्वातंत्र्यवीर सावरकर पूल व अन्य काही पुलांचे जोड खराब झाल्यामुळे पुलावर आडवी रेघ असलेला मोठा खड्डा तयार झाला आहे. पुलाचा रोज वापर करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा शारिरीक त्रास होत आहे; त्याचबरोबर वाहनेही मोठ्या संख्येने नादुरुस्त होत आहेत. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त गुरुवारच्या अंकात छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अखत्यारीत हे पूल येतात. त्यांच्याकडून बातमीची दखल घेण्यात आली. या विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे याबाबत म्हणाले, ‘‘पुलावरचे डांबरी लेअर व हा जोड एकाच लेव्हलला असणे अपेक्षित आहे. पूल नवा असताना ते तसेच असतात. कालांतराने ते खराब होतात. नव्याने डांबरीकरण करताना ते पूर्वीसारखे केले जाणे आवश्यक असते; मात्र तसे होत नाही व नंतर खड्डा वाढत जातो.’’शास्त्रीय तत्त्वानुसार हा जोड मोकळा ठेवणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वातावरणाचा परिणाम म्हणून सिमेंट प्रसरण व आकुंचन पावत असते. अशी मोकळी जागा ठेवली नाही, तर त्यातून संपूर्ण बांधकामाला तडा जातो. त्यामुळे मोकळी जागा ठेवावीच लागते, असे शिंदे म्हणाले. आता काही पुलांवरचे जोड खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्याची मोहीम सुरू करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)