शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

राज्यात पूरस्थिती; शासकीय यंत्रणा जवळपासही नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:39 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे.

पुणेः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी राज्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मुसळधार पावसानं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घर, लहान मोठ्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा दरवेळी संकटं आल्यावर कष्ट करायला तयार असते. यावेळी मात्र शासकीय यंत्रणा जवळपास नाही, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर आणि सांगली हा महत्वाचा भाग आहे. इथून सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. इथून 30 ते 40 टक्के दुधाचा पुरवठा होतो. या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पुराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे. सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब नुकसान भरपाई द्यायला हवी, पंचनामे करावेत, अशी मागणीही पवारांनी केली आहे. आज प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता पूरग्रस्तांना सेवाभावी संस्था, सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन मदत करावी. पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. लोकांना वाचवणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण नंतर करूया, आधी लोकांना मदतीची गरज आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की, या संकटातून बाहेर काढताना जमेल ते ते सगळे करूया. जमेल त्यांनी संस्थेच्या किंवा व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करावी, असंही पवार म्हणाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊसपिकांच्या शेतांची माहिती घ्यावी. माझ्या पक्षाची यात्रा दुष्काळी भागात आहे. पूरग्रस्तभागात नाही. मात्र आम्ही ती आज आम्ही ती थांबवत आहोत. कार्यकर्त्यांची ऊर्जा मदतीसाठी लागणे गरजेचे आहे. एनडीआरएफसारखी यंत्रणा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे. व्यक्तीगत अनुभव म्हणून महाराष्ट्रात प्रशासक म्हणून काम केले. ज्या ज्या वेळी संकटे आली  तेव्हा महाराष्ट्राची यंत्रणा तुटून पडली. यावेळी असे का झाले नाही हे माहिती नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर