शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना निवडणुकीसाठी 'हे' मुद्दे वाटतात महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:31 IST

निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं, तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात याचा घेतलेला आढावा.

पुणे : अवघ्या महिनाभरावर लाेकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. जगातल्या सर्वात माेठ्या लाेकशाहीची सार्वत्रिक निवडणूक असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष आहे. भारतात येत्या काळात काेणाचे सरकार येणार हे या निवडणुकांमधून स्पष्ट हाेणार आहे. भाजपा, काॅंग्रेस आणि इतर पक्ष हे विविध मुद्दे घेऊन नागरिकांसमाेर येत आहेत. या निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं, तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात याचा घेतलेला आढावा. 

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना सध्या काॅंग्रेसने चालविलेल्या चाैकीदार चाेर है आणि भाजपाच्या मै भी चाैकीदार या कॅम्पेनमध्ये रस नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच लक्ष इतर मुद्द्यांवरुन भरकटविण्यासाठी हे कॅम्पेन चालविण्यात येत असल्याचे तरुण सांगतात.  प्रथमेश यादव म्हणाला, आत्तापर्यंतच्या जाहीरनाम्यांमध्ये जुनेच विषय पुढे केले जात आहेत. राम मंदिर, ट्रिपल तलाक अशाच मुद्दांना निवडणुकीच्या काळात पुढे केले जात आहे. परंतु शिक्षणावर फारसं बाेललं जात नाही. शिक्षणावर लक्ष देणे त्यांचा जाहीर नाम्यात समावेश करणे गरजेचे आहे. शिक्षण हे माेफत आणि समताधिष्ठीत असावं. 

नितेश घुगे म्हणाला, निवडणुकांमध्ये युवकांना संधी द्यायला हवी. पक्ष हे त्याच त्याच उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी बदलायला हवे. त्याशिवाय विकास हाेणार नाही. 

राहुल शेळके म्हणाला, प्रस्तापित राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही माेठ्याप्रमाणावर दिसून येते. त्यात सामान्य नागरिकाला, तरुणाला स्थान दिले जात नाही. तसेच जाहीरनाम्यात आर्थिकबाबींवर लक्ष दिले जात नाहीत. आर्थिक नियाेजन कसे असेल, शिक्षणावर किती खर्च करणार हे सांगितले जात नाही. ते सांगायला हवे. 

अभिजित यामगार ला वाटते शिक्षण ही काळाजी गरज आहे. आज माेठ्याप्रमाणावर बेराेजगार भारतात वाढत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षणातून केवळ कारकून निर्माण हाेत आहेत. उद्याेजक निर्माण हाेतील अशा शिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. वेगळ्याप्रकारचं शिक्षण घेण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तसेच आजूबाजूचं वातावरण आपल्याला प्रवृत्त करत नाही. त्यासाठी सरकारने विविध याेजना राबवून त्या ग्रामीण भागापर्यंत पाेहचवायला हव्यात. ग्रामीण, आदीवासी भागात शिक्षण पाेहचवलं पाहिजे. युवक सुद्धा उद्याेजक हाेऊ शकतात ही जाणीव सरकाने युवकांमध्ये निर्माण करायला हवी. 

चाैकीदार चाेर है आणि मै भी चाैकीदार या कॅम्पेनमुळे इतर मुद्दे निवडणूकीत मागे पडत आहेत असे सुनिल जाधवला वाटते. शिक्षण मूलभूत गरज आहे. क्रांतीसाठी शिक्षण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शिक्षण, आराेग्य, राेजगार याचा समावेश जाहीरनाम्यांमध्ये असणे आवश्यक आहे. या सरकारने राेजगाराबाबत जे आश्वासन दिले ते पाळले नाही. स्टार्ट अप इंडिया सारख्या याेजना या केवळ कागदावर आहेत. राेजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता आहे. आम्हाला 15 लाख नकाेत तर 15 लाखांचं पॅकेज मिळणारं शिक्षण हवंय. विद्यार्थ्यांना संशाेधन करण्यासाठी शिष्यवृत्ती द्यायला हवी. 

आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता, तरुणांचा उपयाेग हा राष्ट्रउभारणीसाठी नव्हे तर राजकीय पक्षांच्या साेयीसाठी करण्यात येत आहे. युवकांची क्रयशक्ती वेगळ्या मार्गांना जाताना दिसून येत आहे. राजकीय साक्षरतेची गरज आहे. राेजगारक्षम शिक्षण आवश्यक आहे असे आकाश मंदाडे ला वाटते. 

राहुल इंगळे म्हणताे, आपला देश विकसित करायचा असेल तर शिक्षणावर माेठ्याप्रमाणवर खर्च करायला हवा. शिक्षणामुळे लाेकं जागृत हाेतील आणि सजग नागरिक निर्माण हाेतील. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेStudentविद्यार्थीVotingमतदान