शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Bull Cart Race: अखेर बैलगाडा शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:11 IST

कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिल्यामुळे ही केस मागील चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती

मंचर: सर्वोच्च न्यायालयात आजपासून बैलगाडा शर्यती संदर्भात सुनावणीस सुरुवात झाली आहे. आज वीस मिनिटे सुनावणी झाली असून त्यामुळे बैलगाडा मालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तामिळनाडू व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये शर्यती सुरू असताना केवळ महाराष्ट्र राज्यात त्या बंद आहेत. केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने जानेवारी २०१६ मध्ये अधिसूचना काढून काही अटी व नियमाच्या अधीन राहून शर्यतीवरील बंदी उठवली होती. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तेव्हापासून बैलगाडा शर्यती पूर्णपणे बंद आहेत. कोरोना संकटामुळे अनेक दिवस सुनावणी होऊ शकली नाही. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारी वकिलांना सुनावणी होण्यासाठी न्यायालयात विनंती अर्ज करण्याची सूचना केली होती. त्यानुसार न्यायालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी ठेवली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलली गेली. त्यानंतर आज सकाळी १०.३०  वाजता बैलगाडा शर्यतीच्या केस बाबत सुनावणीस सुरुवात झाली. 

पुढील आठवड्यात याबाबत उर्वरित सुनावणी होणार

महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती बाबत कायदा केलेला आहे. परंतु या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिल्यामुळे ही केस मागील चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तात्काळ घेतली जावी याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार आज सकाळी सुनावणीस सुरुवात झाली. जवळपास वीस मिनिटे ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ वकिलांनी युक्तीवाद केला. देशांमध्ये इतर राज्यात शर्यती चालू आहेत. मग महाराष्ट्रात का नाही. असा युक्तिवाद करत राज्यातील शर्यतींना परवानगी द्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली. पुढील आठवड्यात याबाबत उर्वरित सुनावणी होणार आहे.

टॅग्स :MancharमंचरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारBull Cart Raceबैलगाडी शर्यत