शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

अखेर सहकारनगरच्या रहिवाशांच्या मदतीला धावला वन विभाग, पुरावर उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:42 IST

पुणे वनविभागाचा पुढाकार

ठळक मुद्देराज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर

पुणे: पावसाळ्यात तळजाई टेकडीवरून पाण्याचा प्रवाह पायथ्याशी येतो. त्यामुळे पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्ये पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून पुणे वनविभागाने तळजाई टेकडीवर छोटे बंधारे बांधत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची योजना आखली आहे. 

दरवर्षी पावसाने तळजाई टेकडीवरील पाणी पायथ्याशी येते. खालच्या भागात असणाऱ्या सहकारनगर २, स्वानंद सोसायटी, सावरकरनगर, क्रांती सोसायटी, भोसले पार्क, खोराड वस्ती, हिंगणे व सिंहगड रस्ता या प्रमुख भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सप्टेंबर २०१९ मध्ये पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे कात्रज, नदीपात्र, अशा ठिकाणाबरोबरच सहकारनगरमध्येही पूर आला होता. या वादळी पावसाच्या पुरामुळे सहकारनगरमधील चार लोकांसह, इतर भागातील १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या पायथ्याशी असणाऱ्या भागातील लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर काहींची वाहने पाण्यात वाहून गेली होती. पुढील काळात पुराचे हे संकट पुन्हा येऊ नये म्हणून पुणे वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पूर टाळण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे ठरवले आहे. 

बुधवारी वन अधिकारी, माजी राज्य पाटबंधारे अधिकारी, पाणलोट व्यवस्थापन तज्ञ आणि स्थानिक रहिवाशी यांच्या पथकाने टेकडीचे सर्वेक्षण केले. टेकडीवरील पाणी नियोजन आणि कंपाउंड भिंत बांधण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी राज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. 

पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले,  आम्ही बुधवारी तळजाई आणि पायथ्याचे सर्वेक्षण केले आहे. तळजाईवर ४० छोटी बंधारे बांधण्याचे काम मे अखेरीस पूर्ण होणार आहे. तसेच पायथ्याशी एक तलाव बांधण्यात येणार आहे. यामुळे पायथ्याशी निर्माण होणारी पूरजन्यपरिस्थिती कमी होईल. तलावाचे पाणी टेकडीवरील झाडांसाठी वापरण्यात येईल. कंपाउंड भिंतीचे काम यापूर्वीच सूरू झाले आहे. तसेच पावसाचे पाणी खाली येऊ नये. म्हणून आजूबाजूला घनदाट बांबूची झाडेही लावण्यात येणार आहेत. 

" अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या की केवळ २० टक्केच पावसाचे पाणी डोंगरावरून खाली जाईल. त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या परिसरातील पूर थांबेल" असे स्थानिक नागरिकाने सांगितले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन कदम म्हणाले की, आम्ही पूरजन्यपरिस्थिती दूर करण्याची राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती केली. भरणे यांनी कंपाउंडच्या पुनर्बांधणीबरोबरच या पाणी नियोजनाला सहमती दर्शवली आहे.

टॅग्स :PuneपुणेforestजंगलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्र