शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

अखेर सहकारनगरच्या रहिवाशांच्या मदतीला धावला वन विभाग, पुरावर उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:42 IST

पुणे वनविभागाचा पुढाकार

ठळक मुद्देराज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर

पुणे: पावसाळ्यात तळजाई टेकडीवरून पाण्याचा प्रवाह पायथ्याशी येतो. त्यामुळे पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्ये पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून पुणे वनविभागाने तळजाई टेकडीवर छोटे बंधारे बांधत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची योजना आखली आहे. 

दरवर्षी पावसाने तळजाई टेकडीवरील पाणी पायथ्याशी येते. खालच्या भागात असणाऱ्या सहकारनगर २, स्वानंद सोसायटी, सावरकरनगर, क्रांती सोसायटी, भोसले पार्क, खोराड वस्ती, हिंगणे व सिंहगड रस्ता या प्रमुख भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सप्टेंबर २०१९ मध्ये पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे कात्रज, नदीपात्र, अशा ठिकाणाबरोबरच सहकारनगरमध्येही पूर आला होता. या वादळी पावसाच्या पुरामुळे सहकारनगरमधील चार लोकांसह, इतर भागातील १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या पायथ्याशी असणाऱ्या भागातील लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर काहींची वाहने पाण्यात वाहून गेली होती. पुढील काळात पुराचे हे संकट पुन्हा येऊ नये म्हणून पुणे वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पूर टाळण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे ठरवले आहे. 

बुधवारी वन अधिकारी, माजी राज्य पाटबंधारे अधिकारी, पाणलोट व्यवस्थापन तज्ञ आणि स्थानिक रहिवाशी यांच्या पथकाने टेकडीचे सर्वेक्षण केले. टेकडीवरील पाणी नियोजन आणि कंपाउंड भिंत बांधण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी राज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. 

पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले,  आम्ही बुधवारी तळजाई आणि पायथ्याचे सर्वेक्षण केले आहे. तळजाईवर ४० छोटी बंधारे बांधण्याचे काम मे अखेरीस पूर्ण होणार आहे. तसेच पायथ्याशी एक तलाव बांधण्यात येणार आहे. यामुळे पायथ्याशी निर्माण होणारी पूरजन्यपरिस्थिती कमी होईल. तलावाचे पाणी टेकडीवरील झाडांसाठी वापरण्यात येईल. कंपाउंड भिंतीचे काम यापूर्वीच सूरू झाले आहे. तसेच पावसाचे पाणी खाली येऊ नये. म्हणून आजूबाजूला घनदाट बांबूची झाडेही लावण्यात येणार आहेत. 

" अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या की केवळ २० टक्केच पावसाचे पाणी डोंगरावरून खाली जाईल. त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या परिसरातील पूर थांबेल" असे स्थानिक नागरिकाने सांगितले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन कदम म्हणाले की, आम्ही पूरजन्यपरिस्थिती दूर करण्याची राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती केली. भरणे यांनी कंपाउंडच्या पुनर्बांधणीबरोबरच या पाणी नियोजनाला सहमती दर्शवली आहे.

टॅग्स :PuneपुणेforestजंगलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्र