शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
2
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
3
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
4
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
5
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
6
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
7
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
8
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
9
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
10
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
11
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
12
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
13
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
14
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
15
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
16
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
17
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
18
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
19
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
20
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सहकारनगरच्या रहिवाशांच्या मदतीला धावला वन विभाग, पुरावर उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:42 IST

पुणे वनविभागाचा पुढाकार

ठळक मुद्देराज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर

पुणे: पावसाळ्यात तळजाई टेकडीवरून पाण्याचा प्रवाह पायथ्याशी येतो. त्यामुळे पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्ये पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून पुणे वनविभागाने तळजाई टेकडीवर छोटे बंधारे बांधत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची योजना आखली आहे. 

दरवर्षी पावसाने तळजाई टेकडीवरील पाणी पायथ्याशी येते. खालच्या भागात असणाऱ्या सहकारनगर २, स्वानंद सोसायटी, सावरकरनगर, क्रांती सोसायटी, भोसले पार्क, खोराड वस्ती, हिंगणे व सिंहगड रस्ता या प्रमुख भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सप्टेंबर २०१९ मध्ये पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे कात्रज, नदीपात्र, अशा ठिकाणाबरोबरच सहकारनगरमध्येही पूर आला होता. या वादळी पावसाच्या पुरामुळे सहकारनगरमधील चार लोकांसह, इतर भागातील १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या पायथ्याशी असणाऱ्या भागातील लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर काहींची वाहने पाण्यात वाहून गेली होती. पुढील काळात पुराचे हे संकट पुन्हा येऊ नये म्हणून पुणे वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पूर टाळण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे ठरवले आहे. 

बुधवारी वन अधिकारी, माजी राज्य पाटबंधारे अधिकारी, पाणलोट व्यवस्थापन तज्ञ आणि स्थानिक रहिवाशी यांच्या पथकाने टेकडीचे सर्वेक्षण केले. टेकडीवरील पाणी नियोजन आणि कंपाउंड भिंत बांधण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी राज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. 

पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले,  आम्ही बुधवारी तळजाई आणि पायथ्याचे सर्वेक्षण केले आहे. तळजाईवर ४० छोटी बंधारे बांधण्याचे काम मे अखेरीस पूर्ण होणार आहे. तसेच पायथ्याशी एक तलाव बांधण्यात येणार आहे. यामुळे पायथ्याशी निर्माण होणारी पूरजन्यपरिस्थिती कमी होईल. तलावाचे पाणी टेकडीवरील झाडांसाठी वापरण्यात येईल. कंपाउंड भिंतीचे काम यापूर्वीच सूरू झाले आहे. तसेच पावसाचे पाणी खाली येऊ नये. म्हणून आजूबाजूला घनदाट बांबूची झाडेही लावण्यात येणार आहेत. 

" अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या की केवळ २० टक्केच पावसाचे पाणी डोंगरावरून खाली जाईल. त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या परिसरातील पूर थांबेल" असे स्थानिक नागरिकाने सांगितले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन कदम म्हणाले की, आम्ही पूरजन्यपरिस्थिती दूर करण्याची राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती केली. भरणे यांनी कंपाउंडच्या पुनर्बांधणीबरोबरच या पाणी नियोजनाला सहमती दर्शवली आहे.

टॅग्स :PuneपुणेforestजंगलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्र