शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुर तालुक्यात लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील २५ लाख गुलाब,शोभेची रोपे वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:41 IST

कोरोनाचा रोपवाटिका धारक व्यवसायाला फटका; कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार

ठळक मुद्देअहमदाबाद,विजापूर, पुणे,लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी रोपांना मोठी मागणी

सतिश सांगळेकळस : राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलाव टाळण्यासाठी संचारबंदी घोषित झाल्याने लॉकडाऊनमध्ये रोपवाटिका धारकांचे मोठे नुकसान झाले आहे .कळस (ता.इंदापुर) येथील तयार रोपांना ग्राहकच नाही .वाहतूक व्यवस्थाही ठप्प असल्याने रोपवाटिकेतील सुमारे २५ लाख गुलाब, व शोभेची रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे .त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

 इंदापुर तालुक्यातील कळस या ठिकाणी गेली ३० वर्षांपासून रोपवाटिका व्यवसाय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी गुलाब रोपांची निर्मिती केली जात होती .याठिकाणी दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची निर्मिती केली जाते .तसेच येथील रोपवाटीका धारकांनी विस्ताराने सर्व रोपे तयार करून आपल्या व्यवसायाला मोठे स्वरुप दिले .या ठिकाणी लहान मोठ्या सुमारे ५०रोपवाटिका आहेत .येथील तसेच यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ५०० आहे .तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेकडो महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत होता. त्यांचेही नुकसान झाले आहे.आपल्या व्यवसायात रोपवाटिका मालकांनी चांगली प्रगती साधली होती .मात्र,कोरोनाचा फैलाव झाल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद झाली .त्यामुळे रोपवाटिकाधारकांचा विक्रीचा माल वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील रोपांना आंध्रप्रदेश मधील राजमंड्री,गुजरात मधील अहमदाबाद, कर्नाटक मधील विजापूर व राज्यातील पुणे,लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी मोठी मागणी असते. विक्रीचा काळ लोटलाअसल्याने गुलाबाची कळीधारण केलेली रोपे फेकून द्यावी लागणार आहेत.यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. तसेच नियमित विक्रीची लिंब,चिंच,अशोक, गुलमोहर, करंज, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम,निलगिरी, बांबू, रेन ट्री,पारिजातक, फायकस, या शोभेच्या नाशवंत मालाचीप्रत खराब होऊन नुकसान सोसावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात शोभेच्यारोपांना चांगली मागणी असते .पणलॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने माल पडूनराहिला आहे.———————————————...लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान

उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येत आहे.रोपवाटिका धारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. त्यामुळे लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान होत आहे विलास पानसरे, कळस (रोपवाटीका धारक)—————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस