शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

राज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती: गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 4:32 PM

देशात अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

पुणे : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. मात्र, मागील दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये निश्चितपणे डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच देशात अशांतता निर्माण करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षांकडून सुरु आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यायला हवे असा हल्लाबोल पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप खासदार गिरीश बापट हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनासह विविध मुद्दयांवर भाष्य केले. बापट म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कायदा कुठल्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नसून त्यात काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. 

... त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेलमुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी देखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. आता मात्र तेच त्यांच्या मूळ विचाराला विरोध दर्शवित आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल,” अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर नाही; पण...  

राज्यातील ठाकरे सरकार मला काही अस्थिर वाटत नाही. मात्र ज्यावेळी ते पडेल त्यांला कारणीभूत तेच असतील. आणि जरी ते पडले नाही तरी आम्हाला काही त्याच्याशी देणे घेणे नाही. या घडीला आम्ही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून यापुढेही ते करत राहणार आहोत, असे भाष्य पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप