शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:04 IST

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे

पुणे (सासवड) : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी नकाशा जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २८३२ हेक्टर वरती शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.  त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित करून तहसिलदार कचेरी वर  मोर्चा काढून तहसिलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.          छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर येथे करणार असल्याचे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून  सांगितले जात आहे. मात्र वृत्त पत्रा मधून वृत्त येते या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रित्या या संभाव्य जागेत येणाऱ्या गावामध्ये शासनाच्या वतीने काहीच चर्चा, काम अथवा नियोजन शासनाकडून झाले नाही .या शासनाच्या फसव्या कृतीचा दखल घेत शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधा साठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.         दि.२४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळ बाबत नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांना विमानतळा बाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिध्द झाले पासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे,  आणि विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल असे त्या मध्ये नमूद केले होते .मात्र नोटीस प्रसिध्द होऊन सतरा  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील येथे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे विमानतळा बाबत शेतकऱ्यांचा तर कायम विरोध आहेच मात्र शासन देखील उदासीन वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला असे चित्र आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकती देखील तहसिलदार पुरंदर येथे घेणेस शासनाने अंमलबजावणी करावी. नकाशा तहसिलदार पुरंदर यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी विमानतळ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळ विरोधी जन संघर्ष समिती)शेतकऱ्यांना जाहीर नोटीस द्वारे हरकत घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला मात्र याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही,  प्रशासकीय पातळीवर देखील नकाशा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही , शासन जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या साठ दिवसाच्या कालावधीत विमानतळास विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत.

टॅग्स :purandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरी