शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:04 IST

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे

पुणे (सासवड) : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी नकाशा जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २८३२ हेक्टर वरती शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.  त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित करून तहसिलदार कचेरी वर  मोर्चा काढून तहसिलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.          छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर येथे करणार असल्याचे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून  सांगितले जात आहे. मात्र वृत्त पत्रा मधून वृत्त येते या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रित्या या संभाव्य जागेत येणाऱ्या गावामध्ये शासनाच्या वतीने काहीच चर्चा, काम अथवा नियोजन शासनाकडून झाले नाही .या शासनाच्या फसव्या कृतीचा दखल घेत शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधा साठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.         दि.२४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळ बाबत नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांना विमानतळा बाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिध्द झाले पासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे,  आणि विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल असे त्या मध्ये नमूद केले होते .मात्र नोटीस प्रसिध्द होऊन सतरा  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील येथे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे विमानतळा बाबत शेतकऱ्यांचा तर कायम विरोध आहेच मात्र शासन देखील उदासीन वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला असे चित्र आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकती देखील तहसिलदार पुरंदर येथे घेणेस शासनाने अंमलबजावणी करावी. नकाशा तहसिलदार पुरंदर यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी विमानतळ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळ विरोधी जन संघर्ष समिती)शेतकऱ्यांना जाहीर नोटीस द्वारे हरकत घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला मात्र याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही,  प्रशासकीय पातळीवर देखील नकाशा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही , शासन जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या साठ दिवसाच्या कालावधीत विमानतळास विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत.

टॅग्स :purandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरी