शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:04 IST

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे

पुणे (सासवड) : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी नकाशा जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २८३२ हेक्टर वरती शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.  त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित करून तहसिलदार कचेरी वर  मोर्चा काढून तहसिलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.          छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर येथे करणार असल्याचे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून  सांगितले जात आहे. मात्र वृत्त पत्रा मधून वृत्त येते या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रित्या या संभाव्य जागेत येणाऱ्या गावामध्ये शासनाच्या वतीने काहीच चर्चा, काम अथवा नियोजन शासनाकडून झाले नाही .या शासनाच्या फसव्या कृतीचा दखल घेत शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधा साठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.         दि.२४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळ बाबत नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांना विमानतळा बाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिध्द झाले पासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे,  आणि विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल असे त्या मध्ये नमूद केले होते .मात्र नोटीस प्रसिध्द होऊन सतरा  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील येथे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे विमानतळा बाबत शेतकऱ्यांचा तर कायम विरोध आहेच मात्र शासन देखील उदासीन वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला असे चित्र आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकती देखील तहसिलदार पुरंदर येथे घेणेस शासनाने अंमलबजावणी करावी. नकाशा तहसिलदार पुरंदर यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी विमानतळ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळ विरोधी जन संघर्ष समिती)शेतकऱ्यांना जाहीर नोटीस द्वारे हरकत घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला मात्र याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही,  प्रशासकीय पातळीवर देखील नकाशा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही , शासन जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या साठ दिवसाच्या कालावधीत विमानतळास विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत.

टॅग्स :purandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरी