शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात शेतकरी स्वतःच जाळतायत शेतातील ऊस? नेमकं कारण काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:09 IST

उजनीकाठावर ऊस जाळून तोडण्याचा सपाटा, शेतकऱ्यांचे नुकसान...

पळसदेव (पुणे) : पळसदेव भागासह इंदापूर तालुक्यात अनेक भागांत ऊस तोडून नेण्यासाठी प्रतिएकरनुसार ऊसतोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला दररोज २०० रुपये भत्ता असा दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे करूनही ऊसतोडणी कामगारांनी सध्या ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा लावला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पोटच्या पोरागत दीड वर्ष सांभाळलेल्या उसाला डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऊस जाळून तोडला जात असल्याचे चित्र आहे, त्यामुळे जळिताचा ऊस गाळपाला गेल्यावर शेतकऱ्याचे प्रतिटनानुसार नुकसान होत आहे. सध्या रोगग्रस्त नसलेलादेखील ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा उजनी काठावर सुरू आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवशकता निर्माण झाली आहे. उजनी पट्ट्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. सध्या नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. काही ठिकाणी उसाला तुरे येऊन स्थिर झाले आहेत. उसाचे वजन घटत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या अडचणींचा गैरफायदा घेण्याचे काम ऊसतोडणी कामगार व ऊस वाहतूक करणारे मालक घेत आहेत.

अनेक शेतकरी चांगल्या प्रतीचा ऊस खाजगी कारखान्याला गाळपाला देत आहेत व रोगग्रस्त ऊस कर्मयोगी कारखान्याने न्यावा अशी अपेक्षा करत आहेत. सहकार टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे. रोगग्रस्त ऊस तोडणे कामगारांना त्रासदायक आहे, त्यामुळे ऊस पेटवून तोडला जात आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचादेखील ऊस कर्मयोगी कारखान्याला गाळपासाठी द्यावा व इतर रोगग्रस्त ऊसदेखील कारखाना गाळपासाठी नेणार आहे. एकाही सभासदाचा ऊस राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

- भूषण काळे (संचालक, कर्मयोगी सहकारी कारखाना)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेDamधरण