शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:15 IST

शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देखंडित वीजपुरवठा सुरु करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी

पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथे  महावितरण कंपनीच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करुन यावेळी ऊर्जामंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली.  

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध,फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपुर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारी मध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही.

परंतु महावितरण कंपनी मुळे आज कानगाव सहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरण कंपनीने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करून शेती व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेलीआहेत तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण  कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जा मंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

विद्युत विज वितरण कंपनीने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा. यासाठी 'सुरू करा सुरू करा खंडीत विज पुरवठा सुरू करा, महावितरण कंपनीचा निषेध असो शेतकरी एक जुटीचा विजय असो' या घोषणा आंदोलकांनी दिल्या. खंडीत विज पुरवठा सुरू न केल्यास २६ ऑगस्ट २०२१ पासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी  पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेFarmerशेतकरीelectricityवीजUday Samantउदय सामंतCentral Governmentकेंद्र सरकार