शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

देवेंद्र फडणवीसांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:35 IST

सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे.  

पुणे : सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, फडणवीस यांनी शुक्रवारी सीएए आणि एनआरसीवरून बोलताना जर हा कायदा महाराष्ट्र सरकारने स्वीकारला नाही तर 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' असे विचारण्याची वेळ येईल असे म्हटले होते. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून पाटील यांनी तर फडणवीसांना सल्ला दिला आहे. 

याबाबत ते म्हणाले की, 'त्यांना माझा विनंती वजा सल्ला आहे की त्यांनी फार आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये. सरकार नुकतेच गेले असताना माजी मुख्यमंत्र्यांनी तरी लगेच अशी भूमिका घेऊ नये. जरा काळ जाऊ दे, मग भूमिका घ्यावी असेही सांगायला ते विसरले नाहीत. 

यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बँकेतून  इतरत्र वळवण्याच्या  निर्णयवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ' असा कोणताही निर्णय आमच्या सरकारने घेतला नसून मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय आम्ही विनाकारण फिरवणार नाही'.आगामी शपथविधीवर त्यांनी संवाद भूमिका मांडताना शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा