शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे

By राजू हिंगे | Updated: May 3, 2024 15:37 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता...

पुणे : भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईल. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करूनच होतात. आमच्याकडे टीम वर्क आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली. पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. शिवसेनेचा ठाकरे गट आकड्यावर गेला. त्यामुळे आम्ही आकड्यावर गेलाे. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असेही तावडे यांनी सांगितले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सकृत मोकाशी उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्पात झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे. मे महिन्यातील ऊन हे एप्रिल महिन्यातच जाणवत आहे. 'आयेगा तो मोदी' असे वातावरण आहे. २० ते ३० टक्के बुथवर विरोधी पक्षाचे कार्यकर्त दिसत नाहीत. काँग्रेसची देशात सत्ता असताना राज्यघटनेत ८० वेळा बदल केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी केलेल्या जाहीरातीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो नाही. या जाहीरातीत केवळ मुद्दे मांडले जावे असा काँग्रेस पक्षाने विचार केलेला दिसतो. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना सून सुनेत्रा पवार बाहेरची वाटत आहे. अमरावतीच्या उमेदवाराबददल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राउत यांनी केलेले वक्तव्य यावरून प्रचार खालच्या स्तरावर गेला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या बदलल केलेल्या विधानबाबत विचारले असता तावडे म्हणाले, मोदी व्यक्तिगत राजकारण करत नाही. भाजप बेरजेचे राजकारण करत आहे. त्यामुळे मनसेला बरोबर घेतले आहे. भाजपला महिला मतदार आणि प्रथम मतदान करणारे मतदार पसंती देत आहे. 

महायुतीला ४० जागा  मिळतील -

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीला ४० जागा मिळतील. आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा काढत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे, असे विनोद तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही -

दिल्लीत जाऊन बघण्याच्या दृष्टीकोन बदलला आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही. राष्ट्रातच म्हणजे दिल्लीच राहणार आहे, याचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.

पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय-

रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदी