शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे

By राजू हिंगे | Updated: May 3, 2024 15:37 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता...

पुणे : भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईल. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करूनच होतात. आमच्याकडे टीम वर्क आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली. पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. शिवसेनेचा ठाकरे गट आकड्यावर गेला. त्यामुळे आम्ही आकड्यावर गेलाे. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असेही तावडे यांनी सांगितले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सकृत मोकाशी उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्पात झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे. मे महिन्यातील ऊन हे एप्रिल महिन्यातच जाणवत आहे. 'आयेगा तो मोदी' असे वातावरण आहे. २० ते ३० टक्के बुथवर विरोधी पक्षाचे कार्यकर्त दिसत नाहीत. काँग्रेसची देशात सत्ता असताना राज्यघटनेत ८० वेळा बदल केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी केलेल्या जाहीरातीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो नाही. या जाहीरातीत केवळ मुद्दे मांडले जावे असा काँग्रेस पक्षाने विचार केलेला दिसतो. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना सून सुनेत्रा पवार बाहेरची वाटत आहे. अमरावतीच्या उमेदवाराबददल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राउत यांनी केलेले वक्तव्य यावरून प्रचार खालच्या स्तरावर गेला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या बदलल केलेल्या विधानबाबत विचारले असता तावडे म्हणाले, मोदी व्यक्तिगत राजकारण करत नाही. भाजप बेरजेचे राजकारण करत आहे. त्यामुळे मनसेला बरोबर घेतले आहे. भाजपला महिला मतदार आणि प्रथम मतदान करणारे मतदार पसंती देत आहे. 

महायुतीला ४० जागा  मिळतील -

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीला ४० जागा मिळतील. आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा काढत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे, असे विनोद तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही -

दिल्लीत जाऊन बघण्याच्या दृष्टीकोन बदलला आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही. राष्ट्रातच म्हणजे दिल्लीच राहणार आहे, याचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.

पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय-

रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदी