शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

कारखान्यांची होणार दमछाक, शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:09 PM

हंगाम लांबण्याची शक्यता : शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

सोमेश्वरनगर : साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याचा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्याता आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण उसाचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.

राज्यातील साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निर्णयामुळे कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार असून गाळप हंगाम मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच ऊसतोडणी कामगारांनीही संप पुकारला आहे. परिणामी, जादा ऊस असणाऱ्या कारखान्यांना गाळप वेळेत उरकणे अवघड होणार आहे. संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. त्यातच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सुरू होत आहे. त्याअगोदर ऊसतोडणी कामगारांचा संप मिटणे आवश्यक आहे; अन्यथा दिवाळीनंतर जर हे कामगार कारखानास्थळावर दाखल झाले, तर हंगाम अजून लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे-पाटील यांनी २७ आॅगस्ट रोजी ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन साखर संघाला दिले आहे. निवेदनात ऊसतोडणी मजुरीत दुप्पट वाढ व्हावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ व्हावी, राज्य सरकारने २०१४-१५मध्ये २० टक्क्यांची वाढ करून द्यावी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळेची सोय करावी, ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना शासनाच्या कामगार विभागाची ओळखपत्रे देण्यात यावीत, ऊसतोडणीवर कामगारांना बसत आलेला टॅक्स कपात करू नये, ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी आदी मागण्यांसह १५ मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्यासाठी कामगार संघटना अडून बसली आहे.हंगाम संपण्यासाठीमोठा कालावधीऊस हंगाम उशिरा सुरू करण्याच्या निर्णयामुळे गाळप हंगाम संपण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १२ लाख टनांपर्यंत उसाची उपलब्धता आहे. अनेक कारखान्यांनी सक्षम ऊसतोडणी यंत्रणा उभी केली आहे. या वर्षी हार्वेस्टरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र, संप लवकर मिटला नाही, तर कारखाने नियमित सुरू होण्यासाठी ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.उसाचे वाढते क्षेत्र पाहता, मंत्री समितीने कारखाने सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरला परवानगी देणे गरजेचे होते. तसेच हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानेही ऊस लवकर जाणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगार संप लवकर मिटणे, हेही कारखाने वेळेवर सुरू होण्यासाठी आवश्यक आहे.- अशोक पवार,अध्यक्ष, घोडगंगा कारखानाअनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, कारखानदार व शासन कोणताही तोडगा काढत नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.- गहिनीनाथ थोरे-पाटीलअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटना

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने