शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
6
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
7
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
8
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
9
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
10
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
11
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
12
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
13
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
14
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
15
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
16
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
17
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
18
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
19
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
20
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:34 IST

फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जीवनदायिनी असलेल्या नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत नदीपात्रातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या निमसाखरच्या पश्चिम भागात नदीपात्रात पाणी साठा दिसून येत असला तर निमसाखरपासून पुढे निरवांगी बाजूला नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे.

पाऊस सुरू होण्याचा साधारण १५ जूनपर्यंतचा कालावधी गृहीत धरल्यास शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या बाबतीत दाहकता निर्माण होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे. नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची ढापे टाकून पाणी गळती थांबवण्यात आली असल्याने फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंतच हे पाणी टिकू शकते.तालुक्याच्या पश्चिम भागात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, उसासोबतच डाळिंब, केळी, पेरू, द्राक्ष यासारख्या फळबागांचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, कडवळ पिकांची लागवड केली जाते. या पिकांचे भवितव्य बहुतांश प्रमाणात नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणीसाठा घटत असल्याने या पिकांचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे.

नीरा नदीपात्रात सध्या पाणी पातळी कमी होत आहे. वाढत्या उन्हामुळे हे पाणी पंधरा ते वीस दिवसांपेक्षा अधिक दिवस पाणीसाठा उपयुक्त ठरेल. मात्र, आता आमच्याकडे ऊस पीक असून, नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर पावसाळ्यापर्यंत पिकासाठी व जनावरांच्या पिण्यासाठीच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. -हरिश्चंद्र रणवरे, शेतकरी, निमसाखर  नीरा नदीमध्ये निमसाखरपासून खाली निरवांगी, खोरोची भागात पाणी राहिले नसून सध्या पिकांसाठी पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या भागातील पिकांच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत आहेत. -समीर जाधव, युवा शेतकरी, निरवांगी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात