शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 14:08 IST

आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेत त्यांनी भोंग्यावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. ठाण्यातील सभेत राज यांनी मशिदीवरचे भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा देशभरात हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयीन निर्णयाचा दाखला घेऊन भोंगे काढण्याबाबत भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर कायद्याचे अभ्यासक असीम सरोदे यांनी याबाबत अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी कायद्याच्या मदतीने या वादामध्ये उडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने असीम सरोदे यांच्याशी  संवाद साधला. त्यावेळी त्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे सरोदे यांनी सांगितले आहे.        

सरोदे म्हणाले, आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमातील डिजे, फटाके तसेच चर्च, गुरुद्वारा, मंदिरे, मशीद, यामधील स्पीकर यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर प्रतिबंध लावण्यासाठी हे निर्णय दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एका निर्णयात न्यायालयाने शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदुषण थांबवावे असं सांगितले होते. पण आतापर्यंत शांतता क्षेत्राची व्याख्याच केली नाही. न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाचा दाखला देऊन मशिदीवरील भोंगे उतरावेत, अशी भूमिका घेतली याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे.

इतर गोंगाटवेळी कोणी काही बोलत नाही 

ख्रिसमस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आंबेडकर जयंती, विश्वकर्मा जयंती, दत्त जन्म व जयंती, दुर्गाउत्सव, महावीर जयंती, स्वामी बसवेश्वर जयंती, गणपती उत्सव, दिवाळी, लग्न, क्रिकेटची मॅच जिंकणे अश्या अनेक वेळी 'गोंगाट' व उत्सवाच्या प्रदूषित साजरीकरण बंद करण्याबाबत कुणी बोलत नाहीत याबाबतचे अनेक ट्विटही त्यांनी केले आहेत. 

टॅग्स :Asim Sarodeअसिम सराेदेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाSocialसामाजिक