शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

'सगळे उन्हातान्हात अडकलेत, मी त्यांना पाणी वाटतोय'; माणसातला देवमाणूस बनला तहानलेल्यांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:06 IST

पुणे मुंबई हायवेवर उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले

पुणे : माणसाला समाजकार्य, मदत करण्यासाठी पैसा अथवा संस्थेची गरज भासते. असं खोडून टाकणारं एकमेव उदाहरण पुणे मुंबई हायवेवर पाहायला मिळालं आहे. पाणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एखाद्याची तहान भागवण्यारखे पूण्य कुठंही मिळत नाही. अशीच माणुसकी दाखवणारी गोष्ट पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाली. हायवेवर एक टँकर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यावेळी त्याठिकाणी उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे. त्याबद्दल पुण्यातील गौरी नावाच्या युवतीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. 

पुणे मुंबई हायवेवर २६ मार्चला सकाळी केमिकलचा टँकर पलटी झाल्याने हायवेवर पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा गौरी या पुण्याहुन मुंबईकडे निघाल्या होत्या. तब्बल तीन तास ट्राफिक मध्ये अडकून राहिल्याने त्यांची पुण्याला परत जाण्याची इच्छा झाली होती. परंतु त्यावेळी गौरी यांना सिद्धेश गायकवाड नावाचा युवक दिसला. तो त्यांच्यासमोर अर्धा लिटर पाण्याची बाटली घेऊन आला. आणि त्याने पाणी पाहिजे का? असं विचारलं... गौरी यांनी हो म्हणून बाटली घेतली आणि किती देऊ विचारले. तर त्याने सांगितलं मी सगळ्यांना पाणी वाटत आहे पैसे नको आहेत मला असं तो यावेळी म्हणाला. चार पाच तास झाले आहेत. सगळे एकाच जागी अडकून पडले आहेत. म्हणून मी फ्री पाणी देत आहे सगळ्यांना..., असे त्याने गौरी यांना सांगितले. 

उन्हाळा वाढला आहे, लहान मुलं असतात सोबत घेतलेलं पाणी पण एवढ्या वेळात गरम होऊन गेलं असेल या सगळ्याचा विचार करून छोटासा सिद्धेश गायकवाड आणि त्याची बहीण असे दोघे जण हायवे वर अडकलेल्या सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होता. 

सिद्धेशला ओळखणारे असतील तर त्याला नक्की कळवा - गौरी 

तेव्हा गौरी यांनी त्याला विचारलं 'एक फोटो घेऊ का रे तुझा तर नको कशाला उगीच ताई एवढंच म्हणाला.  मग थोड्या गप्पा मारल्या नंतर तयार झाला. व त्यांनी सिद्धेश बरोबर एक फोटोही घेतला. फेसबुक वर नाहीये हा दादा.. पण लोणावळा, पांगोळी चे कोणी त्याला ओळखणारे असतील तर नक्की त्याला कळवा व्हायरल करा असे गौरी यांनी सांगून सिद्धेश गायकवाडचे आभार मानले. पैसे देऊन पण पाणी मिळेल असं दुकान सुध्दा आजूबाजूला नसताना बसल्या जागी मिळालेलं पाणी म्हणजे अमृत च वाटलं त्या वेळेला अशा वेळी या जगात चांगली माणसं आहेत याचा प्रत्यय येतो असाही त्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsocial workerसमाजसेवकSocial Viralसोशल व्हायरलWaterपाणीHeat Strokeउष्माघात