शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'सगळे उन्हातान्हात अडकलेत, मी त्यांना पाणी वाटतोय'; माणसातला देवमाणूस बनला तहानलेल्यांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:06 IST

पुणे मुंबई हायवेवर उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले

पुणे : माणसाला समाजकार्य, मदत करण्यासाठी पैसा अथवा संस्थेची गरज भासते. असं खोडून टाकणारं एकमेव उदाहरण पुणे मुंबई हायवेवर पाहायला मिळालं आहे. पाणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एखाद्याची तहान भागवण्यारखे पूण्य कुठंही मिळत नाही. अशीच माणुसकी दाखवणारी गोष्ट पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाली. हायवेवर एक टँकर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यावेळी त्याठिकाणी उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे. त्याबद्दल पुण्यातील गौरी नावाच्या युवतीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. 

पुणे मुंबई हायवेवर २६ मार्चला सकाळी केमिकलचा टँकर पलटी झाल्याने हायवेवर पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा गौरी या पुण्याहुन मुंबईकडे निघाल्या होत्या. तब्बल तीन तास ट्राफिक मध्ये अडकून राहिल्याने त्यांची पुण्याला परत जाण्याची इच्छा झाली होती. परंतु त्यावेळी गौरी यांना सिद्धेश गायकवाड नावाचा युवक दिसला. तो त्यांच्यासमोर अर्धा लिटर पाण्याची बाटली घेऊन आला. आणि त्याने पाणी पाहिजे का? असं विचारलं... गौरी यांनी हो म्हणून बाटली घेतली आणि किती देऊ विचारले. तर त्याने सांगितलं मी सगळ्यांना पाणी वाटत आहे पैसे नको आहेत मला असं तो यावेळी म्हणाला. चार पाच तास झाले आहेत. सगळे एकाच जागी अडकून पडले आहेत. म्हणून मी फ्री पाणी देत आहे सगळ्यांना..., असे त्याने गौरी यांना सांगितले. 

उन्हाळा वाढला आहे, लहान मुलं असतात सोबत घेतलेलं पाणी पण एवढ्या वेळात गरम होऊन गेलं असेल या सगळ्याचा विचार करून छोटासा सिद्धेश गायकवाड आणि त्याची बहीण असे दोघे जण हायवे वर अडकलेल्या सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होता. 

सिद्धेशला ओळखणारे असतील तर त्याला नक्की कळवा - गौरी 

तेव्हा गौरी यांनी त्याला विचारलं 'एक फोटो घेऊ का रे तुझा तर नको कशाला उगीच ताई एवढंच म्हणाला.  मग थोड्या गप्पा मारल्या नंतर तयार झाला. व त्यांनी सिद्धेश बरोबर एक फोटोही घेतला. फेसबुक वर नाहीये हा दादा.. पण लोणावळा, पांगोळी चे कोणी त्याला ओळखणारे असतील तर नक्की त्याला कळवा व्हायरल करा असे गौरी यांनी सांगून सिद्धेश गायकवाडचे आभार मानले. पैसे देऊन पण पाणी मिळेल असं दुकान सुध्दा आजूबाजूला नसताना बसल्या जागी मिळालेलं पाणी म्हणजे अमृत च वाटलं त्या वेळेला अशा वेळी या जगात चांगली माणसं आहेत याचा प्रत्यय येतो असाही त्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsocial workerसमाजसेवकSocial Viralसोशल व्हायरलWaterपाणीHeat Strokeउष्माघात