शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'सगळे उन्हातान्हात अडकलेत, मी त्यांना पाणी वाटतोय'; माणसातला देवमाणूस बनला तहानलेल्यांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:06 IST

पुणे मुंबई हायवेवर उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले

पुणे : माणसाला समाजकार्य, मदत करण्यासाठी पैसा अथवा संस्थेची गरज भासते. असं खोडून टाकणारं एकमेव उदाहरण पुणे मुंबई हायवेवर पाहायला मिळालं आहे. पाणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एखाद्याची तहान भागवण्यारखे पूण्य कुठंही मिळत नाही. अशीच माणुसकी दाखवणारी गोष्ट पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाली. हायवेवर एक टँकर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यावेळी त्याठिकाणी उन्हातान्हात अडकलेल्या माणसांची तहान भागवणारा माणसातला देवमाणूस आधार बनल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे. त्याबद्दल पुण्यातील गौरी नावाच्या युवतीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. 

पुणे मुंबई हायवेवर २६ मार्चला सकाळी केमिकलचा टँकर पलटी झाल्याने हायवेवर पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती. तेव्हा गौरी या पुण्याहुन मुंबईकडे निघाल्या होत्या. तब्बल तीन तास ट्राफिक मध्ये अडकून राहिल्याने त्यांची पुण्याला परत जाण्याची इच्छा झाली होती. परंतु त्यावेळी गौरी यांना सिद्धेश गायकवाड नावाचा युवक दिसला. तो त्यांच्यासमोर अर्धा लिटर पाण्याची बाटली घेऊन आला. आणि त्याने पाणी पाहिजे का? असं विचारलं... गौरी यांनी हो म्हणून बाटली घेतली आणि किती देऊ विचारले. तर त्याने सांगितलं मी सगळ्यांना पाणी वाटत आहे पैसे नको आहेत मला असं तो यावेळी म्हणाला. चार पाच तास झाले आहेत. सगळे एकाच जागी अडकून पडले आहेत. म्हणून मी फ्री पाणी देत आहे सगळ्यांना..., असे त्याने गौरी यांना सांगितले. 

उन्हाळा वाढला आहे, लहान मुलं असतात सोबत घेतलेलं पाणी पण एवढ्या वेळात गरम होऊन गेलं असेल या सगळ्याचा विचार करून छोटासा सिद्धेश गायकवाड आणि त्याची बहीण असे दोघे जण हायवे वर अडकलेल्या सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होता. 

सिद्धेशला ओळखणारे असतील तर त्याला नक्की कळवा - गौरी 

तेव्हा गौरी यांनी त्याला विचारलं 'एक फोटो घेऊ का रे तुझा तर नको कशाला उगीच ताई एवढंच म्हणाला.  मग थोड्या गप्पा मारल्या नंतर तयार झाला. व त्यांनी सिद्धेश बरोबर एक फोटोही घेतला. फेसबुक वर नाहीये हा दादा.. पण लोणावळा, पांगोळी चे कोणी त्याला ओळखणारे असतील तर नक्की त्याला कळवा व्हायरल करा असे गौरी यांनी सांगून सिद्धेश गायकवाडचे आभार मानले. पैसे देऊन पण पाणी मिळेल असं दुकान सुध्दा आजूबाजूला नसताना बसल्या जागी मिळालेलं पाणी म्हणजे अमृत च वाटलं त्या वेळेला अशा वेळी या जगात चांगली माणसं आहेत याचा प्रत्यय येतो असाही त्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsocial workerसमाजसेवकSocial Viralसोशल व्हायरलWaterपाणीHeat Strokeउष्माघात