शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रोज दोन लाख लिटर पाण्याची होतेय नासाडी; नियोजनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:26 IST

दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- मनोहर बोडखे दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे. नुकतीच तहसील कचेरीत टंचाई आढावा बैैठक झाली. या बैैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले की, भविष्यात अन्न मिळेल पण पाणी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातच तालुक्याच्या जिरायत पट्ट्यात ९ टँकर सुरु झाले आहेत.एप्रिल, मे या महिन्यांत टँकरची संख्या जास्त असते. मात्र चालू वर्षी दोन महिने अगोदर ९ टँकर सुरु झाले ही पाणीटंचाईच्या दृष्टीने गंभीर बाब झाली आहे. तेव्हा पाणीटंचाई निवारणासाठी योग्य ते कामकाज झाले पाहिजे की जेणेकरुन पाण्याचे नियोजन केले जाईल.नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक नळकोंडाळ्यांना तोट्या बसविलेल्या नाहीत. तेव्हा पाणी सुरु झाल्यानंतर हे नळकोंडाळे सुरु होतात. तेव्हा नळकोंडाळ््यांना तोट्या नसल्याने बेसुमार पाणी वाया जात असते.तेव्हा सर्वात प्रथम या नळकोंडाळ््यांना तोट्या बसविणे गरजेचे आहे. तसेच वरवंड ते कुरकुंभ औद्योगिक वसाहत याचबरोबरीने पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अन्य काही भागांत आहे. तेव्हा नगर परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी गळतीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हिवाळी शिबिर अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळी कामे दिली जातात. त्यानुसार प्रत्येक शिबिरात ग्रामीण पातळीवर वनराई बंधारा बांधणे सक्तीचे केले तर भविष्यात या बंधाºयांमध्ये पावसाचे पाणी साचून पाण्याचे नियोजन होऊ शकते.नदीकाठच्या गावांमध्ये सध्याच्या परिस्थितीत बहुतांशी ठिकाणी वाळूउपसा केला जात आहे. तेव्हा वाळू ट्रकमध्ये भरल्यानंतर ही वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. वाळू धुतल्यानंतर वाळूची माती बाजूला होते आणि वाळूला चांगला भाव मिळतो ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वाळूमाफिया चोरीची वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करतात.साधारणत: एक ट्रक वाळू धुण्यासाठी सुमारे १000 लीटरच्या जवळपास पाणी वाया जाते. त्यानुसार दररोज दीडशेच्यावर ट्रकमधील वाळू धुतली जाते. याकामी दोन लाख लीटर पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा महसूल विभागाने वाळूमाफियांवर योग्य ती जरब बसवून बेकायदा वाळू धुण्यासाठी जे काही पाणी वाया जाते यावर जरब बसवली पाहिजे. गेल्या पंधरवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास दौैंड ते पाटस यादरम्यान एकापाठोपाठ एक सुमारे तीस ते पस्तीस वाळूचे ट्रक येत होते. या सर्व ट्रकमधून वाळू धुतलेल्या पाण्याची गळती लागली होती. एकंदरीतच दौंड ते पाटस या २0 किलोमीटरच्या अंतरावर जणू काही रस्त्यावर पाऊस पडला आहे. इतपत ओला रस्ता झाला होता. परिणामी सध्याच्या परिस्थितीत शिरुर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात अवैैध वाळू वाहतूक होत आहे. आणि ही वाळू दौैंडमार्गे पुढे पुण्याला पाठवली जात असते. एकंदरीत या सर्व पाणी वाया जाण्याचे प्रकार बघितले तर यावर शासनाने निर्बंध घातले पाहिजेत.एकूणच वाळूमाफीयांवरील निर्बंधाबरोबर तालुक्याला उन्हाळ््यात लागणाºया पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.तडीपार आणि दंडगेल्या आठवड्यात वाळूमाफियांसंदर्भात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या की एका वाळूमाफियाला ज्याच्यावर वाळूचोरीचे गुन्हे आहेत, त्याला दौैंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे; तर दुसरीकडे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तीन ते चार वाळूमाफियांना साडेचार कोटींचा दंड ठोठावला आहे. जर अशी कडक कारवाई वाळूमाफियांवर झाल्यास बेकायदा वाळू काढली जाणार नाही, परिणामी ती पाण्याने धुतली जाणार नाही; किंबहुना बेसुमार पाणी वाया जाणार नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीPuneपुणे