शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:01 IST

राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालंय ते काही बदलणार नाही, किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील या सहा कुटुंबाना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. 

असावरी म्हणाली, आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी. पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही. पुण्यात जॉब असावा. राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालय ते काही बदलणार नाही. किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत. आमचं भविष्य अंधारमय झालय. पैशांनी गोष्टी मिळतात. पण माणूस म्हणून आधार मिळत नाही. त्यांनी मानसिक आधार दिला आहे. मी सरकारचे खूप आभार मानते. 

हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे - प्रगती जगदाळे 

अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत, मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही. लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत. आम्ही अजूनही त्या फायरींगच्या घटनेतच आहोत. असावरीला सरकारकडून आश्वासन मिळाली आहेत. म्हणून मी आनंदी आहे. पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खर सांगितलं आहे. आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. त्याच राजकारण करू नका. त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आला हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी माणुसकी म्हणून सर्वानी विचार केला पाहिजे. वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे. त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे. तुम्ही आमच्याशी वागू नका नका. आम्ही कुणीही काही खोटं बोलत नाही. तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नाही, हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं असावरीच्या आई प्रगती जगदाळे यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkatrajकात्रजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार