शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अपेक्षा उरल्या नाहीत; माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख

By श्रीकिशन काळे | Updated: December 24, 2023 17:29 IST

आरोग्य अदालततर्फे ‘सर्वोच्च न्यायलय आणि कलम ३७०' विषयावर व्याख्यान

पुणे: काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे तात्पुरत्या स्वरूपाचेच होते. कलम ३७० तात्पुरत्या स्वरूपाचेच होते यामुळे ते रद्द होणार होतेच, मात्र ते करण्याची प्रक्रिया फक्त उलटी झाली आहे. यामुळे काश्मिरमध्ये विधानसभा अस्तित्वात नसताना कलम ३७० रद्द करण्यात आले, ही प्रक्रिया चुकीच्या मार्गाने झाली आहे. आपल्याला आता फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा उरल्या आहेत, मात्र तिथेही काही प्रमाणात निराशा होताना दिसत आहे. असेच सुरू राहिले तर आपले संविधान आणि संघराज्य पद्धत धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असे मत माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख यांनी व्यक्त केले.

आरोग्य सेनेच्या वतीने आयोजित आरोग्य अदालत कार्यक्रमात 'सर्वोच्च न्यायालय आणि कलम ३७०' या विषयावर माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य उपस्थित होते.

यावेळी माजी न्यायमूर्ती पारेख म्हणाले की, काश्मिरमध्ये जसे अन्य राज्यातील नागरिक जमीन खरेदी करू शकत नाहीत तसेच सिक्कीम, आसाम, नागालँड आणि मिझोराम मध्ये सुद्धा कलम ३७१ मुळे जमीन खरेदी करता येत नाही. भारत हे संघराज्य आहे, यामुळे राज्याच्या हिताला बाधा येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असते, ती काळजी आजचे केंद्रातील सरकार घेताना दिसत नाही. आज देशावर मोठी आपत्ती आलेली आहे. केंद्रातील मोदी सरकार भारतीय संविधानाच्या मूलभूत स्तंभांना धक्का देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे विविध घटनांच्या माध्यमातून उघड झाले आहे.

डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारकडून संविधानाचा गळा दाबण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केलेल्या विविध घोषणांचा पुरस्कार किंवा अंमलबजावणी करताना दिसते. त्या आधारेच काश्मिरचे त्रिभाजन झाल्याचे दिसते. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1952 साली अशीच मागणी केली होती. देशाला वाचवायचे असेल तर सत्तेतील विभाजनवादी सरकार हटविण्याची गरज आहे.

३७० कलम हे मुळात काश्मिरी पंडितांच्या मागणीतून जन्माला आले. काश्मिरी पंडितांचे हत्याकांड भाजपा प्रणित राजवटीत घडले, हे विसरून चालणार नाही. या कलमाच्या आडून काश्मिरी जनतेला आणि त्या आडून देशातील सर्व मुस्लिम समाजाला राष्ट्रद्रोही ठरविण्याचे षडयंत्र रचण्यात आले. अशाच ३७१ कलमाच्या आधारे अरुणाचल, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, आसाम आदी राज्यांना असाच दर्जा देण्यात आला आहे, हे जनतेपासून दडविण्यात आले. मुख्य प्रश्न या राज्यांतील जमिनी अदानी अंबानी सारख्या उद्योग पतींच्या घश्यात घालण्याचा आहे. मणिपूर जळण्याचे कारण देखील हेच आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. - डॉ. अभिजित वैद्य

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSocialसामाजिकIndiaभारतadvocateवकिलJammu Kashmirजम्मू-काश्मीर