शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर देखील आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय नाही, हा दुर्दैवी प्रकार; सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:35 IST

शिवसेना पक्ष त्यांचे चिन्ह काढून घेण्याचे पाप शिंदे यांनी केले हे अत्यंत दुर्दैवी

इंदापूर : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर तरी काही निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत खा. सुप्रिया सुळे यांनी नाराजी जाहीर केली. इंदापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर सोमवारी ( दि.२५)  त्या पत्रकारांशी बोलत होत्या.    त्या म्हणाल्या की, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केली. ते हयात असताना तिची जबाबदारी त्यांनी उद्धव ठाकरेंवर दिली. हा निर्णय स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचा होता, अशी पार्श्वभूमी असताना त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह काढून घेण्याचे पाप शिंदे यांनी केले हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारे आहे.    पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर कारवाई अत्यंत दुर्दैवी आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी भाजपसाठी जेवढे केले. तेवढे करणारे नेते महाराष्ट्रातील फार कमी असतील. मुंडे महाजन यांनी संघर्ष केला. सत्तेत नसताना पक्ष सत्तेत आणण्यासाठी कष्ट केले. त्यांनी मुलगी आत्ता लढते आहे, भाजपमध्ये आहे. त्या मुलीवर अन्याय करण्याचे पाप भाजप करतो आहे, त्याचा आपण जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सुळे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये त्यांच्यातील एक खासदार होता, त्याचे नाव मला घ्यायचे नाही. त्यांचे घर याच प्रकारच्या अडचणीत सापडले होते. परंतु भाजप म्हणा किंवा कोणता तरी अदृश्य हात यांनी त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला असा सवाल त्यांनी केला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव म्हणायचे, मग पंकजा मुंडे भाजपची लेक नाही का. आपण अश्या गोष्टीत कधीच राजकारण आणणार नाही. मात्र मुंडे यांच्या बाजूने असणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.    महाविकास आघाडी सरकारने इंदापूर तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला तरी देखील निकृष्ट कामे होत असल्याच्या बाबीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अधिकची माहिती असेल तर द्या असे आवाहन खा.सुळे यांनी पत्रकारांना केले..बावडा भांडगाव या विवादित रस्त्याच्या कामाची करणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्या रस्त्याची पाहणी केली आहे. जिल्हाधिका-याबरोबर बोलणे झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दीड वर्षापासून लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांमुळे सामान्यांची कामे ठप्प झाली आहेत. निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे आधी चर्चा करायचे, आता कोणी बोलत ही नाही. तिकीट ही मागत नाहीत,असे निरीक्षण सुळे यांनी नोंदवले. माझ्यापासून कोणी दुरावलेले नाही. माझ्याकडून कोणाला दुरावा नाही, असे मत व्यक्त करत विधानसभेसाठी उमेदवार कोण या प्रश्नाला उत्तर देताना आधी लोकसभा तर होवू द्या, असे उत्तर सुळे यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारणRahul Narvekarराहुल नार्वेकर