शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:17 IST

एखादा प्राणी मृत झाला की, त्याला परत पाहता येत नाही, पण जर तो मृत झाल्यावरही त्याला पाहता आलं तर किती भारी वाटेल ना

श्रीकिशन काळे

पुणे : एखादा प्राणी मृत झाला की, त्याला परत पाहता येत नाही, पण जर तो मृत झाल्यावरही त्याला पाहता आलं तर किती भारी वाटेल ना! होय आता तशी सोय करता येते. याला टॅक्सिडर्मी असे म्हणतात. प्राणी पक्षी जतन करण्याची इंग्रजांनी भारताला दिलेली कला टॅक्सिडर्मिस्ट चंद्रशेखर पाटील व रोहित खिंडकर हे जपत असून, यांद्वारे ते प्राणी संवर्धनाचे काम करीत आहेत. एखादा प्राणी मृत झाल्यावर त्याला टॅक्सिडर्मी केली, तर तो प्राणी तसाच शंभर वर्षे पाहता येतो.

भारतात अवघे सहा टॅक्सिडर्मिस्ट शिल्लक आहेत. त्यातील चंद्रशेखर पाटील आणि रोहित खिंडकर हे प्रसिद्ध आहेत. यांचे योगदान मोठे आहे. भारतात बडोद्याला एम. एस. युनिव्हर्सिटी येथे एथिकल टॅक्सिडर्मी शिकविले जायचे, त्या शेवटच्या बॅचचे विद्यार्थी म्हणजे चंद्रशेखर पाटील आणि त्यांचे शिष्य रोहित खिंडकर. आज भारतातील वस्तू संग्रहालयामधील सर्व ट्रॉफी जवळजवळ ७०-८० वर्षे जुन्या आहेत आणि जीर्ण होऊन खराब होत आहेत. त्यांना योग्य वेळी रिस्टोर केलं नाही, तर सर्व नामशेष होऊन भारतातील हा दुर्मीळ नैसर्गिक वारसा संपुष्टात येईल. याच कारणामुळे परदेशातून अनेक ऑफर येऊनही चंद्रशेखर व रोहित हे भारतातच संवर्धन करीत आहेत. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणी अनेक शहरातील वस्तुसंग्रहालय, वन विभाग व वन संस्था यांसाठी चंद्रशेखर पाटील हे काम करतात. टॅक्सिडर्मीची पूर्ण प्रक्रिया व्हायला साधारण २० दिवस ते ८ महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. परंतु, नवीन करण्यापेक्षा जे खराब होत आहेत, त्यांचा जीर्णोद्धार करणे जास्त महत्त्वाचे. कारण त्याला जवळ जवळ १०० वर्षांचा इतिहास आणि वारसा असतो. चंद्रशेखर पाटील हे सुप्रसिद्ध आर्ट कॉन्सर्व्हेटर, बरोडा हिस्टोरियन आहेत. त्यांनी महात्मा गांधींचे पोरबंदर येथील घर रिस्टोर केले. शिवाय रवींद्रनाथ टागोर यांचे घर, जीर्ण झालेली पेशवेकालीन पैठणी, जहांगीर बादशहाचे अस्सल फर्मान यांसारखा अनेक मौल्यवान ठेवा जतन केला, तर साॅफ्टवेअर डेव्हलप करणारे रोहित आवडीमुळे या क्षेत्राकडे वळले. या सर्व प्रक्रियेसाठी वन विभागाचे सहकार्य असते. वाईल्ड लाईफ ॲक्ट १९७२ च्या काही सब सेक्शनमार्फत विशेष परवानगी घेऊनच या गोष्टी होतात.

काय आहे टॅक्सिडर्मी

इजिप्त संस्कृतीमध्ये मृतदेह जतन करतात, (ममीफिकेशन) त्याचेच आधुनिक रूपांतर म्हणजे टॅक्सिडर्मी. टॅक्सिडर्मीच्या माध्यमातून प्राण्यांचे अथवा पक्ष्यांचे अवशेष किंवा संपूर्ण शरीर जपून ठेवू शकतो. याचा वापर पुढील पिढीला अभ्यास, संशोधन, वन्यजीव जागरूकतेसाठी होतो. भारतात १८व्या शतकात इंग्रजांसोबत ही कला आली. एकेकाळी जगप्रसिद्ध ट्राॅफीस भारतात म्हैसूर येथे सर वॅन इंजन हे बनवायचे. याची सुरुवात जरी इंग्रजांनी केली असली तरी भारताने या कलेसाठी मोठं जागतिक योगदान केलं आहे. टॅक्सिडर्मी केलेल्या कला कृतीला ट्रॉफी असे म्हणतात.

रेवदंडा येथील ब्लू व्हेल सांगाडा

रेवदंडा, अलिबाग येथे एका नैसर्गिकरित्या मृत झालेल्या ब्लू व्हेलवर शासकीय आदेशानुसार चंद्रशेखर पाटील यांनी २००३ - ०४ साली प्रक्रिया करून त्याचे संवर्धन केले. त्यावेळी जागतिक पातळीवर त्याची मोठी प्रशंसा झाली. आज त्याठिकाणी स्थानिकांनी संग्रहालय केले आणि स्थानिकांना रोजगार मिळतो आणि अनेक लोक त्याला भेट देतात. तेव्हा या ब्लू व्हेलचे संवर्धनही झाले.

''नामशेष झालेले पक्षी व प्राणी पुढच्या पिढीला पाहता येणार नाहीत. त्यामुळे टॅक्सिडर्मी या कलेच्या माध्यमातून आपण नैसर्गिक मृत झालेल्या प्राणी वन विभागाच्या सहाय्याने प्रक्रिया करून ठेवले तर निदान पुढची १००-१५० वर्षे आपल्याला हे प्राणी बघायला मिळतील. याचा वापर मुलांना शिक्षणासाठी व संशोधनासाठी होऊ शकतो. वन विभागाने सहकार्य केल्यास आपल्या इथे एक सुंदर संग्रहालय होऊ शकते, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे टॅक्सिडर्मिस्ट रोहित खिंडकर यांनी सांगितले.'' 

टॅग्स :wildlifeवन्यजीवSocialसामाजिकforestजंगलDeathमृत्यू