शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

शाश्वत मुल्यांशी जोडलेले लेखक हवेत  : भारत सासणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:02 PM

लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे. बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही.

ठळक मुद्देलघुकथा हा परदेशी प्रकार नसून त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहात

पुणे : सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लेखकाला लघुकथा लिहायची असते. त्यासाठी त्याला जगण्याची, जीवनपटलाच्या परिघाची जाण असावी लागते. जीवनातील अशाश्वत आणि शाश्वत मुल्ये समजून घ्यावी लागतात. केवळ बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. शाश्वत मुल्यांशी जोडलेले, सर्वसामान्यांच्या जगण्याचा शोध घेणारे लेखक वाचकांच्या मनावर कायमस्वरुपी नाव कोरतात, असे मत ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी व्यक्त केली. सिग्नेट पब्लिकेशनतर्फे रवींद्र जोगळेकर लिखित ‘हास्य बाराखडी’ या विनोदी कथासंग्रहाचे आणि ‘झाले मोकळे आकाश’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सासणे यांच्या हस्ते बुधवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, एकपात्री कलाकार बंडा जोशी उपस्थित होते. सासणे म्हणाले, ‘समाजाचे विचार, चिंतन, आव्हाने बदलली तसा लघुकथेचा चेहरामोहराही बदलत गेला. लघुकथा हा परदेशी प्रकार नसून, त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहातच दडलेली आहेत. कालानुरुप कथाकारासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. कथेमधून त्याला सद्यस्थितीचा विचार करुन मांडणी करायची असते. लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे.’बंडा जोशी म्हणाले, ‘विनोदामध्ये मोठे सामर्थ्य असते. दररोजच्या ताणतणावातून विनोदामुळे आनंदी जगता येते. आनंद देणे आणि घेणे हेच विनोदी वाड.मयाचे उद्दिष्ट असते. विनोदी साहित्य जीवनाचा अत्यंत वेगळया दृष्टीने विचार करते. विनोद  ताणतणाव दूर ठेवणारे बुलेटप्रूफ जॅकेट असते. माणूस खळाळून हसतो तेव्हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे विनोदी लेखन करणारे समाजाचे सेवकच असतात. सध्या विनोदी लेखन करणारे मोजके लेखक पहायला मिळतात. दररोजच्या जीवनातील ताणतणाव वाढत असताना गुणवत्तापूर्ण विनोदी लेखनही वाढले पाहिजे.’रवींद्र जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे