शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

By नितीन चौधरी | Updated: December 18, 2023 15:47 IST

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली

पुणे : एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन चांगले होत असून १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात २४.८५ लाख टन, उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी या कालावधीत ८१.८० लक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या साखर हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे.

देशभरात १५ डिसेंबरपर्यंत १२ राज्यांतील ४९९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८५७.०४ लाख टन उसाचे गाळप केले आहे . गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊसगाळप झाले होते. महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात २४३ लाख टन तर कर्नाटकात २११ लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे. तर देशातील साखरेचा सरासरी उतारा ८.६७ टक्के असा असून यात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा सरासरी उतारा ९.३० टक्के मिळाला आहे तर महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ८.४० टक्के आणि कर्नाटकाचा सरासरी साखर उतारा ८.३० टक्के इतका आहे. अर्थात जसजशी थंडी वाढेल तसतसा साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे.

“केंद्र सरकारने ७ डिसेंबरला इथेनॉल निर्मितीवरील बंधन टाकण्याच्या अकस्मात घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील साखर उद्योगात काळजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र सरकारनेच प्रोत्साहित केल्यानुसार देशभरातील आसवनी प्रकल्पांनी इथेनॉल निर्मिती क्षमता वाढीमध्ये जवळपास ३५ हजार कोटी रुपयांची गुंवणूक केली आहे. त्यावरील व्याजाचे हप्ते या निर्णयामुळे वेळेवर चुकते न झाल्यास सदरहून चांगले प्रकल्प त्यांची काहीही चूक नसताना आर्थिदृष्ट्या आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याच सोबत इथेनॉल विक्रीतून २१ दिवसांत मिळणाऱ्या रकमांमुळे कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारून त्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत आणि समाधानकारक ऊस दराची अदायगी करण्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगाच्या संस्थांनी संबंधितांकडे तातडीने दाद मागितल्यानंतर केंद्र सरकारने १५ डिसेंबर रोजीच्या आदेशाद्वारे अगोदरच्या निर्णयात काहीसा बदल करून साखर उद्योगाला अंशतः दिलासा दिला आहे,” असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसSocialसामाजिकIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र