शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

By नितीन चौधरी | Updated: December 18, 2023 15:47 IST

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली

पुणे : एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन चांगले होत असून १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात २४.८५ लाख टन, उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी या कालावधीत ८१.८० लक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या साखर हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे.

देशभरात १५ डिसेंबरपर्यंत १२ राज्यांतील ४९९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८५७.०४ लाख टन उसाचे गाळप केले आहे . गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊसगाळप झाले होते. महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात २४३ लाख टन तर कर्नाटकात २११ लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे. तर देशातील साखरेचा सरासरी उतारा ८.६७ टक्के असा असून यात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा सरासरी उतारा ९.३० टक्के मिळाला आहे तर महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ८.४० टक्के आणि कर्नाटकाचा सरासरी साखर उतारा ८.३० टक्के इतका आहे. अर्थात जसजशी थंडी वाढेल तसतसा साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे.

“केंद्र सरकारने ७ डिसेंबरला इथेनॉल निर्मितीवरील बंधन टाकण्याच्या अकस्मात घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील साखर उद्योगात काळजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र सरकारनेच प्रोत्साहित केल्यानुसार देशभरातील आसवनी प्रकल्पांनी इथेनॉल निर्मिती क्षमता वाढीमध्ये जवळपास ३५ हजार कोटी रुपयांची गुंवणूक केली आहे. त्यावरील व्याजाचे हप्ते या निर्णयामुळे वेळेवर चुकते न झाल्यास सदरहून चांगले प्रकल्प त्यांची काहीही चूक नसताना आर्थिदृष्ट्या आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याच सोबत इथेनॉल विक्रीतून २१ दिवसांत मिळणाऱ्या रकमांमुळे कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारून त्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत आणि समाधानकारक ऊस दराची अदायगी करण्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगाच्या संस्थांनी संबंधितांकडे तातडीने दाद मागितल्यानंतर केंद्र सरकारने १५ डिसेंबर रोजीच्या आदेशाद्वारे अगोदरच्या निर्णयात काहीसा बदल करून साखर उद्योगाला अंशतः दिलासा दिला आहे,” असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसSocialसामाजिकIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र