शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:41 IST

महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता...

ठळक मुद्देरयतच्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमअर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे

पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचा समतेचा विचार आपण स्विकारला, मात्र त्यांनी स्विकारलेली विज्ञानदृष्टी दुर्लक्षित केली. आता ही चूक सुधारण्याची सुरूवात रयत शिक्षण संस्थेपासून झाली आहे. समतेच्या विचारांना विज्ञानाच्या दृष्टीची जोड द्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.रयत च्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील लक्ष्मीबाई पाटील सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेटर या अत्याधुनिक केंद्राचा समावेश होता. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी व रामभाऊ तुपे यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन करण्यात आले.पवार म्हणाले, समतेला विज्ञानाची जोड द्यायला हवी होती. महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता. त्यांनी इंग्रज राजपुत्राला शेतीत सुधारणा करण्याची, संकरित बी-बियाणे वापरण्याची सुचना केली होती. शेतीला जोडधंदा हवा हेही त्यांनी सांगितले होते. ही विज्ञानदृष्टीच होती. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. आता रयत च्या माध्यमातून यात सुधारणा होते आहे. अन्य संस्थांमध्येही याचपद्धतीने विज्ञानाचे शिक्षण द्यायला हवे. रयतने अशी अनेक केंद्र सुरू केली आहेत. त्यातून नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे संशोधन करतील. काकोडकर म्हणाले, आयटीआय मध्ये शिकणारे वेगळे व महाविद्यालयात शिकणारे वेगळे अशी वर्गवारी आपल्याकडे केली जात होती. डोक्याने काम करणाऱ्यांना कौशल्याची आवश्यकता असते. संशोधन करणारे उपलब्ध उपकरणांचा वापर करून ते करतात, मात्र आपल्याला लागणारी उपकरणे आपणच तयार करायचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. ते निर्माण व्हायला हवे.रयत मध्ये सतत नवे काहीतरी सुरू असते ही फार चांगली गोष्ट आहे, कॉल सेंटर सुरू करण्याचे व तेही अत्याधुनिक पद्धतीचे कामही रयतनेच केले.रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्तविक केले. पुणे विद्यापीठाचे कुलगूरू नितीन करमळमकर यांचेही यावेळी भाषण झाले. हडपसरमधून आमदार झालेले व रयत च्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले चेतन तुपे यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद बुरंगले व अन्य प्राध्यापकांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारscienceविज्ञानFarmerशेतकरीagricultureशेती