शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:41 IST

महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता...

ठळक मुद्देरयतच्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमअर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे

पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचा समतेचा विचार आपण स्विकारला, मात्र त्यांनी स्विकारलेली विज्ञानदृष्टी दुर्लक्षित केली. आता ही चूक सुधारण्याची सुरूवात रयत शिक्षण संस्थेपासून झाली आहे. समतेच्या विचारांना विज्ञानाच्या दृष्टीची जोड द्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.रयत च्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील लक्ष्मीबाई पाटील सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेटर या अत्याधुनिक केंद्राचा समावेश होता. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी व रामभाऊ तुपे यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन करण्यात आले.पवार म्हणाले, समतेला विज्ञानाची जोड द्यायला हवी होती. महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता. त्यांनी इंग्रज राजपुत्राला शेतीत सुधारणा करण्याची, संकरित बी-बियाणे वापरण्याची सुचना केली होती. शेतीला जोडधंदा हवा हेही त्यांनी सांगितले होते. ही विज्ञानदृष्टीच होती. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. आता रयत च्या माध्यमातून यात सुधारणा होते आहे. अन्य संस्थांमध्येही याचपद्धतीने विज्ञानाचे शिक्षण द्यायला हवे. रयतने अशी अनेक केंद्र सुरू केली आहेत. त्यातून नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे संशोधन करतील. काकोडकर म्हणाले, आयटीआय मध्ये शिकणारे वेगळे व महाविद्यालयात शिकणारे वेगळे अशी वर्गवारी आपल्याकडे केली जात होती. डोक्याने काम करणाऱ्यांना कौशल्याची आवश्यकता असते. संशोधन करणारे उपलब्ध उपकरणांचा वापर करून ते करतात, मात्र आपल्याला लागणारी उपकरणे आपणच तयार करायचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. ते निर्माण व्हायला हवे.रयत मध्ये सतत नवे काहीतरी सुरू असते ही फार चांगली गोष्ट आहे, कॉल सेंटर सुरू करण्याचे व तेही अत्याधुनिक पद्धतीचे कामही रयतनेच केले.रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्तविक केले. पुणे विद्यापीठाचे कुलगूरू नितीन करमळमकर यांचेही यावेळी भाषण झाले. हडपसरमधून आमदार झालेले व रयत च्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले चेतन तुपे यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद बुरंगले व अन्य प्राध्यापकांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारscienceविज्ञानFarmerशेतकरीagricultureशेती