शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:22 AM

खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत.

आंबेठाण - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, याकरिता वन विभागाने लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आणि वासुली ते वांद्रा असा विस्तार असलेला भामचंद्र डोंगर तर अशा आगीने काही ठिकाणी काळाठिक्कर पडला आहे. वन विभागाने सर्वच डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. डोंगरावर गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, करवंदे, सोनजाई, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल,रानकोंबड्या, मोर, सापांच्या विविध प्रजाती, गवतावरील कीटक यांसारखे असंख्य पशु-पक्षी आढळतात.मागील अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतेक वणवे हे मानवनिर्मित आहेत. या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगली प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. या वणव्याला रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहीम राबवून वेळोवेळी डोंगरावर पट्टे काढणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमी सांगत आहेत. डोंगरावर विविध रंगीबेरंगी फुलपाखरे मोठ्या संख्येने असतात. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अशा वणव्यामुळे अडचणीत सापडल्या जातात.दिवसागणिक कमी होत चाललेली जंगले आणि त्यामुळे कमी होत असलेले वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मानवी वस्ती डोंगराळ भागात सरकत आहे.जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस,कोल्हे, बिबट्या, हरीण, ससे, रानडुकरे, रानमांजर यासारखे अनेक छोटे मोठे भूचर प्राणी यांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून असे प्राणी मानवी वस्त्यांमधे प्रवेश करीत आहे.ंजनावरांना चाराटंचाई : जागा विकण्यासाठी हिंसक प्रकारवणव्यांमुळे डोंगरावरील वाळलेले गवत जळून गेल्याने स्थानिक शेतकºयांच्या जनावरांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होते. खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कारखानदारी उभी राहिली असल्याने जागेला सोन्याचा भाव आला आहे. सपाट व चांगली जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी डोंगर व टेकड्यांवरील जागा विकून करोडो रुपये कमविले आहे.अशा ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक आग लावून देतात. कारण जुना चारा जळून गेल्यावर नवीन चारा चांगल्या प्रतिचा येतो, असेही अनेक लोक सांगतात. परंतू अशा वेळी लावण्यात आलेली आग ही आटोक्यात न आल्याने संपूर्ण डोंगरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,सामाजिक संस्था तसेच प्राणिप्रेमींना एकत्रित करुन जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.1 अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत.2 या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले

टॅग्स :fireआगPuneपुणे