शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:22 IST

खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत.

आंबेठाण - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, याकरिता वन विभागाने लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आणि वासुली ते वांद्रा असा विस्तार असलेला भामचंद्र डोंगर तर अशा आगीने काही ठिकाणी काळाठिक्कर पडला आहे. वन विभागाने सर्वच डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. डोंगरावर गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, करवंदे, सोनजाई, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल,रानकोंबड्या, मोर, सापांच्या विविध प्रजाती, गवतावरील कीटक यांसारखे असंख्य पशु-पक्षी आढळतात.मागील अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतेक वणवे हे मानवनिर्मित आहेत. या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगली प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. या वणव्याला रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहीम राबवून वेळोवेळी डोंगरावर पट्टे काढणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमी सांगत आहेत. डोंगरावर विविध रंगीबेरंगी फुलपाखरे मोठ्या संख्येने असतात. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अशा वणव्यामुळे अडचणीत सापडल्या जातात.दिवसागणिक कमी होत चाललेली जंगले आणि त्यामुळे कमी होत असलेले वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मानवी वस्ती डोंगराळ भागात सरकत आहे.जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस,कोल्हे, बिबट्या, हरीण, ससे, रानडुकरे, रानमांजर यासारखे अनेक छोटे मोठे भूचर प्राणी यांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून असे प्राणी मानवी वस्त्यांमधे प्रवेश करीत आहे.ंजनावरांना चाराटंचाई : जागा विकण्यासाठी हिंसक प्रकारवणव्यांमुळे डोंगरावरील वाळलेले गवत जळून गेल्याने स्थानिक शेतकºयांच्या जनावरांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होते. खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कारखानदारी उभी राहिली असल्याने जागेला सोन्याचा भाव आला आहे. सपाट व चांगली जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी डोंगर व टेकड्यांवरील जागा विकून करोडो रुपये कमविले आहे.अशा ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक आग लावून देतात. कारण जुना चारा जळून गेल्यावर नवीन चारा चांगल्या प्रतिचा येतो, असेही अनेक लोक सांगतात. परंतू अशा वेळी लावण्यात आलेली आग ही आटोक्यात न आल्याने संपूर्ण डोंगरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,सामाजिक संस्था तसेच प्राणिप्रेमींना एकत्रित करुन जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.1 अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत.2 या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले

टॅग्स :fireआगPuneपुणे