शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा अंत, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:22 IST

खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत.

आंबेठाण - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाºया लहानमोठ्या डोंगर व टेकड्यांना वणवा लागत असल्याने या वणव्यात वृक्ष व वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अंत होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, याकरिता वन विभागाने लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आणि वासुली ते वांद्रा असा विस्तार असलेला भामचंद्र डोंगर तर अशा आगीने काही ठिकाणी काळाठिक्कर पडला आहे. वन विभागाने सर्वच डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. डोंगरावर गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, करवंदे, सोनजाई, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल,रानकोंबड्या, मोर, सापांच्या विविध प्रजाती, गवतावरील कीटक यांसारखे असंख्य पशु-पक्षी आढळतात.मागील अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतेक वणवे हे मानवनिर्मित आहेत. या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगली प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. या वणव्याला रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले आहे. वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहीम राबवून वेळोवेळी डोंगरावर पट्टे काढणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमी सांगत आहेत. डोंगरावर विविध रंगीबेरंगी फुलपाखरे मोठ्या संख्येने असतात. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अशा वणव्यामुळे अडचणीत सापडल्या जातात.दिवसागणिक कमी होत चाललेली जंगले आणि त्यामुळे कमी होत असलेले वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मानवी वस्ती डोंगराळ भागात सरकत आहे.जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस,कोल्हे, बिबट्या, हरीण, ससे, रानडुकरे, रानमांजर यासारखे अनेक छोटे मोठे भूचर प्राणी यांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून असे प्राणी मानवी वस्त्यांमधे प्रवेश करीत आहे.ंजनावरांना चाराटंचाई : जागा विकण्यासाठी हिंसक प्रकारवणव्यांमुळे डोंगरावरील वाळलेले गवत जळून गेल्याने स्थानिक शेतकºयांच्या जनावरांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होते. खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कारखानदारी उभी राहिली असल्याने जागेला सोन्याचा भाव आला आहे. सपाट व चांगली जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी डोंगर व टेकड्यांवरील जागा विकून करोडो रुपये कमविले आहे.अशा ठिकाणी अनेक स्थानिक नागरिक आग लावून देतात. कारण जुना चारा जळून गेल्यावर नवीन चारा चांगल्या प्रतिचा येतो, असेही अनेक लोक सांगतात. परंतू अशा वेळी लावण्यात आलेली आग ही आटोक्यात न आल्याने संपूर्ण डोंगरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,सामाजिक संस्था तसेच प्राणिप्रेमींना एकत्रित करुन जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.1 अनेक वर्षांपासून या डोंगरांवर वणवे लागल्याच्या घटना घडत आहेत.2 या वणव्याला रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे वास्तव यातून पुढे आले

टॅग्स :fireआगPuneपुणे