शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

पुणे शहरातील बीआरटी बंद नको, सक्षम करा; वाहतूक तज्ज्ञांचा आयुक्तांच्या भूमिकेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 1:04 PM

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुळात सर्व अभ्यासाअंतीच शहरात बीआरटीला सुरूवात आतापर्यंत बीआरटीवर कोट्यावधी रुपये खर्चसातारा रस्ता बीआरटीचे कोट्यावधी रुपये खर्चुन पुर्नविकासाचे काम सुरू

पुणे : बीआरटीमुळे वाहतूककोंडी सुटली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या भूमिकेवर वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी बंद करण्याऐवजी ती अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बीआरटी सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांशीच चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा चर्चा कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना गायकवाड यांनी बीआरटीबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ‘बीआरटी मार्गातून सलग बस जात नाही. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी झाली नाही. त्यामुळे याचा फेरविचार करावा लागेल. शहरात ८० टक्के दुचाकी वाहने आहेत. या वाहनांना बीआरटी मार्गातून प्रवेश देता येईल का?, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. चर्चा करूनच बीआरटी बाबत निर्णय घेऊ, अशा स्पष्ट शब्दांत गायकवाड यांनी बीआरटीला रेड सिग्नल दिला आहे. यावर वाहतूक तज्ज्ञांसह पीएमपी प्रवासी संघटनांनीही टीका केली आहे. बीआरटी बंद करून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. उलट बीआरटी अधिक सक्षम करण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुळात सर्व अभ्यासाअंतीच शहरात बीआरटीला सुरूवात करण्यात आली. आता पुन्हा तज्ज्ञांशी चर्चा करून काहीच साध्य होणार नाही. खासगी वाहनांना प्रोत्साहन दिल्यास कोंडीत अधिकच भर पडेल. आतापर्यंत बीआरटीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने बस खरेदी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल, असे तज्ज्ञांनी नमुद केले.-------------सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बीआरटी चांगली आहे. ती अधिक सक्षम करण्यासाठी अट्टाहास हवा. योग्यप्रकारे अंमलबजावणी न झाल्याने शहरात बीआरटी अयशस्वी ठरली, हे अधिकाºयांनी मान्य करायला हवे. पुणेकरांचे कोट्यांवधी रुपये खर्च होत असताना प्रशासकीय व्यवस्था डोळे व तोंड बंद करून बसली होती का? बीआरटी बंद केली तर ही सर्व पुणेकरांची केलेली घोर फसवणूकच होईल. करदात्यांच्या पैशावर टाकलेला मोठा दरोडा असेल. आयुक्तांनी तात्पुरता पर्याय शोधण्यापेक्षा बीआरटीच्या माध्यमातून दीर्घकालीन विचार करायला हवा.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच...........सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून शहरातील ८० टक्के प्रवासी वाहतूक व्हायला हवी, असे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी बीआरटीला प्राधान्य द्यायलाच हवे. त्याशिवाय ही व्यवस्था सक्षम होणार नाही. बीआरटी सुरू झाली तेव्हा १२ टक्के प्रवासी हे दुचाकी सोडून बसकडे वळले होते. एका बसमधून जवळपास ८० प्रवासी ये-जा करू शकतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी इतर खासगी वाहनांच्या तुलनेतच बसचे महत्व खूप आहे. एकुण १०० किलोमीटर बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. सातारा रस्ता बीआरटीचे कोट्यावधी रुपये खर्चुन पुर्नविकासाचे काम सुरू आहे. गणेशखिंड रस्त्यावर बीआरटी प्रस्तावित आहे. ही कामे अधिक वेगाने पुर्ण करण्याऐवजी बीआरटीच बंद करणे योग्य नाही. खासगी वाहनांचे कितीही लाड केले तरी वाहतूक कोंडी सुटणार नाही. २०१५ मध्ये सर्व अभ्यास करूनच बीआरटी सुरू करण्यात आली. विकास आरखड्यासह इतर अहवालांमध्ये बीआरटीला प्राधान्य देण्यात आले. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे बीआरटी बंद करणे चुकीचे ठरेल.- प्रांजली देशपांडे, वास्तुविशारद व वाहतूक नियोजनकार-----------

बीआरटीमुळे वाहतूक कोंडी सुटलेली नाही, असे आयुक्तांचे मत आहे. मुळात आपण बीआरटी व्यवस्थित केलीच नसताना असा निष्कर्ष कसा काढता येईल? वाहतूक कोंडी ही खासगी वाहनांच्या भरमसाठ वाढीमुळे झाली आहे. तिच्यावर नियंत्रण आणायला आपण काय केले? उदा. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली का? दुचाकींसाठी फ्री वे केल्यास त्यांचा वापर अजून वाढेल. मग कोंडी कमी होईल का? बीआरटी सारखे प्रकल्प सर्वसाधारण सभेने मंजूर केले आहेत, ते काही विचार करूनच. केवळ एका अधिकाºयाच्या मतानुसार त्यांचा फेरविचार करता येणार नाही.- हर्षद अभ्यंकर,सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका