शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक वॉर्डऐवजी ‘प्रभागा’ने ?

By admin | Updated: August 18, 2015 04:01 IST

गेल्या सहा महिन्यांतील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालामध्ये ‘एमआयएम’सह प्रादेशिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळत आहे.

हणमंत पाटील, पुणेगेल्या सहा महिन्यांतील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालामध्ये ‘एमआयएम’सह प्रादेशिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक वॉर्डऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा राज्यातील युती सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे विद्यमान कायद्यानुसार एक सदस्यीय वॉर्डपद्धती की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने आगामी महापालिका निवडणूक होणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा असून, इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय राज्यघटनेने एक व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याविषयीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने कायद्यानुसार एका व्यक्तीला एक मतदान करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्यात सत्तेत आलेल्या भाजप व शिवसेना युतीच्या सरकारने सहा महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्याविषयीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूक विभागाला वॉर्डरचनेनुसार मतदारयादी व नकाशावर ब्लॉक दाखविण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी दिले होते. पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादी व ब्लॉक रचनेचे काम सुरू केले आहे. दरम्यानच्या काळात नांदेड, औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये ‘एमआयएम’ या पक्षासह प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रभाव कायम असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका एकसदस्यीय वॉर्डऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत. नवीन प्रभाग पद्धती एक व दोन सदस्यीय करण्याऐवजी तीन ते चार सदस्यीय एक प्रभाग केल्यास भाजप-शिवसेना युतीला फायदा होण्याचे राजकीय तर्क लढविले जात आहेत. कार्यकर्त्यांच्या मागणीवर भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी गांभीर्याने विचार करीत आहेत. मात्र, त्याविषयी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास कोणीही तयार नाही. सध्याच्या एकसदस्यीय वॉर्डचा निर्णय बदलून बहुसदस्यीय प्रभाग करण्यासाठी राज्य विधिमंडळात नव्याने दुरुस्ती विधेयक आणावे लागणार आहे. कायद्यात आवश्यक दुरुस्ती अथवा वटहुकूम काढण्याचे अधिकार शासनकर्त्यांना आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होऊ शकतील, असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.