शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘एल्गारचा खटला चालविण्याचा अधिकार सत्र न्यायालयास नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:07 AM

सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

पुणे : सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. हा दावा प्रथम वर्ग न्यायालय तसेच संबधित सत्र न्यायालयात करताना त्यांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल केला. याबाबत गुरुवारी दोन्ही न्यायालयात सुनावणी झाली.एल्गार प्रकरणातील आरोपपत्र थेट सत्र न्यायालयात चुकीच्या पद्धतीने दाखल केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेकडून एखाद्या खटल्याचा तपास केल्यास त्याची विशेष न्यायालयात सुनावणी करण्याची तरतूद आहे. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनी फॉरेन्सिक लेबॉरेटरीचे अधिकारी रोज उपस्थित राहून क्लोन कॉपीची प्रकिया सुरू ठेवण्यास तयार असल्याचे न्यायालयास सांगितले. यावर बचाव पक्षाला न्यायालयाने लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले. याबरोबर जिल्हा सरकारी वकिलांना म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.