शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

राज्यातले सरकार मोदी-शहा यांचे गुलाम : नाना पटोले

By राजू इनामदार | Updated: September 17, 2022 16:34 IST

पटोले यांनी राज्यातील भाजप-शिंदेसेना सरकारला लक्ष्य केले...

पुणे: दीड लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातने पळवला. आता उपमुख्यमंत्री म्हणतात पुढच्या २ वर्षात महाराष्ट्राला पुढे नेऊ. ते सोडा, तुम्ही ५ वर्षे सत्तेवर होता त्यावेळी गुजरातला कायकाय दिले त्याची यादी द्या अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले. राज्यातले सरकार केंद्रीतीत मोदी शहा यांचे गुलाम आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसभवनमध्ये पक्षाच्या ओबीसी आघाडीने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण मंथन परिषदेचे उदघाटन शनिवारी सकाळी पटोले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी राज्यातील भाजप-शिंदेसेना सरकारला लक्ष्य केले. पक्षाच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष  अजयसिंग यादव, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, नोटाबंदीच्या काळात देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. त्यातून मिळालेला पैसे मोदी सरकारने राज्यांमधील निवडणुकांसाठी वापरला. याच पैशातून आमदार विकत घेतले जात आहेत. आमच्यातून कोणी जाणार नाही याचा विश्वास आहे, मात्र कोणाच्या मनात काय सुरू आहे ते सांगता येत नाही. काँग्रेसने देश उभा केला म्हणून मोदींना आता तो विकता येत आहे.

राधाकृष्ण विखे त्यांचा भ्रष्ट्राचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये गेले अशी टीका पटोले यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही दहिहंडी, गणेशउत्सवातील नाचगाण्यातच रमले आहेत. त्यांच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. फडणवीस यांनी गमजा मारण्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी सत्तेवर असताना गुजरातला कायकाय दिले ते सांगावे असे ते म्हणाले.

मोदी ओबीसी आहेत असे भाजप सांगत असल्याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले, मोदी ओबीसी नाहीत. भाजप खोटे सांगत आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत, योग्य वेळ येताच ते जाहीर केले जातील. बांठिया आयोगाने आडनावे विचारून ओबीसींची संख्या ठरवली जे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता अधिकृतपणे देशातील ओबीसींची जनगणना करावी.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस