शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु; अजितदादांची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 15:55 IST

पहिले काही दिवस हे दोघेच मंत्री होते, मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर आता फक्त वीसच मंत्री आहेत

पुणे: लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. बारामती येथे नेहमीप्रमाणे आढावा बैठकांसाठी पवार रविवारी (दि. २३) आले होते. यावेळी ते बोलत होते. 

 पवार म्हणाले, हे सरकार येऊन दहा महिने झाले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून अनेक मुद्दे हाती घेतले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीला भेगा पडल्या असे म्हटले जाणारच. ४३ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहीने घेता येतात. पहिले काही दिवस हे दोघेच मंत्री होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. आत्ता फक्त २० च मंत्री आहेत. अजून २३ लोकं मंत्रीमंडळामध्ये भरली नाहीत. राज्यमंत्री कोणालाही केले नाही. एकाही महिलेला मंत्री केले नाही, हे घडलं आहे की नाही? असा उलट सवाल करत पवार पुढे म्हणाले, हे द्यायचं सोडून आणि तिसरच काहीतरी विचारायचं. लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत आहे.

मला कोणी चांगले म्हणत असतील तुमच्या पोटात का दुखतं...

 मुंबई येथील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. नागपूर येथून येताना आमची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मी स्वत: लक्ष घालतो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरच्या सभेला परवानगी देताना सुद्धा त्यांनी नाटके केली होती. इतकेच लोक हवेत तितकेच लोक हवेत असे आडवेढे घेतले होते. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या चौकटीत आपली मतमतांतरे प्रत्येकाने व्यक्त करावीत.  मला जर कोणी चांगले म्हणत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? असा सवाल करत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने चांगले काम करावे. कोणी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे