शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

कारवाईचा असाही परिणाम ; प्राणांतिक अपघाताचे प्रमाण झाले 44 टक्क्यांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:13 PM

गेल्या काही महिन्यांपासून पुणे वाहतूक पाेलिसांकडून वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने त्याचा परीणाम आता दिसून येत आहे.

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे वाहतूक पाेलिसांकडून वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने त्याचा परीणाम आता दिसून येत आहे. 2018 च्या जानेवारी महिन्यात 27 प्राणांतिक अपघात पुणे व परिसरात झाले हाेते. हेच प्रमाण जानेवारी 2019 मध्ये 15 वर आले आहे. याची टक्केवारी 44.44 इतकी आहे. वाहतूक पाेलीस करत असलेल्या कारवाईमुळे हे प्रमाण कमी हाेण्यास मदत झाली आहे. 

भारतात अपघातात प्राण गमविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त हाेत असतात. शहरातही विविध कारणांमुळे अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा वाहतूकीचे नियम न पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणे तसेच रस्तांमध्ये असणारे दाेष यांच्यामुळे वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न पुणे वाहतूक पाेलिसांनी सुरु केला. शहरातील ज्या भागात सातत्याने अपघात हेतात असे ब्लॅक स्पाॅटची यादी करण्यात आली. त्या भागांमध्ये करावायची सुधारणा याबद्दल पुणे महानगरपालिकेशी वाहतूक शाखेने पत्रव्यवहार केला. तसेच शहरात कारवाई कडक करण्याता आली. तसेच नियमभंग करणाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. सध्या शहरात 26 समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येत असून दरराेज 100 नियमभंग करणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. 

त्याचबराेबर 100 नंबरवर ट्रॅफिक जाम बद्दलचे येणारे फाेनही आता कमी झाले आहेत. जानेवारी 2017 मध्ये 202 काॅल आले हाेते, 2018 मध्ये 190 तर जानेवारी 2019 मध्ये हे प्रमाण 162 इतके कमी झाले हाेते. हेल्मेट सक्तीचा देखील सकारात्मक परीणाम दिसून येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीDeathमृत्यू