शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मोठ्या जलप्रकल्पांचा आर्थिक व सामाजिक स्तर जोखावा : मेधा पाटकर :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:09 IST

सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा खर्च राज्य शासनच करणार आहे.

ठळक मुद्दे ‘नर्मदेचे धडे-महाकाय जलप्रकल्पांचे भवितव्य’ यावर परिसंवाद 

पुणे : मोठ्या जलप्रकल्पांमधून वीज, पाणी मिळविण्यासाठी जगभरातील विविध देशांमधून भिन्न-भिन्न निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्हीने खुली चर्चा व्हावी. मोठे धरण प्रकल्प राबविताना सामाजिक, पर्यावरणीय समस्या निर्माण होऊन विस्थापितांचे प्रचंड नुकसान झाल्याचा निष्कर्ष जागतिक धरण आयोगाने नोंदविले आहेत. याच धर्तीवर मोठ्या जलप्रकल्पांचा आर्थिक, सामाजिक स्तर जोखण्याचा प्रयोग भारतातही व्हावा, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केली.  अफार्म संस्था आणि भवताल मॅगझिन यांच्या वतीने आयोजित ‘नर्मदेचे धडे-महाकाय जलप्रकल्पांचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादामध्ये पाटकर बोलत होत्या. जलसंपदा विभागाचे माजी सचिव निवृत्त विद्यानंद रानडे, पाणी आणि सिंचन कायद्यांचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे, मेरीचे माजी महासंचालक दि. मा. मोरे या वेळी उपस्थित होते.रानडे म्हणाले, ‘‘कृषीक्रांती झाल्यानंतर देशातील अन्नधान्य उत्पादनात झपाट्याने वाढ झाली असून सध्या त्यामध्ये एक प्रकारचा साचलेपणा आला आहे. तसेच अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्णता हा भारतासमोरील मोठा प्रश्न असून त्याकरिता सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासह भारतात आतापर्यंत झालेल्या जलविकासामुळे गुंतागुंत झाली असून, त्यामुळे विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.’’

.....................

सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन सरदार सरोवर प्रकल्पाचे लाभक्षेत्र असणाऱ्या सौराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची पीछेहाट झाली आहे. सध्या गांधीनगरमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आणि विस्थापित झालेले असे शेतकरी एकत्र जमून आंदोलन करीत आहेत. मूलभूत मुद्द्यांवर आधारित अभ्यास न करता सरदार सरोवर प्रकल्पाचे सादरीकरण जागतिक बँकेसमोर करण्यात आले. मात्र, जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यानंतर बँकेकडून निधी रोखण्यात आला. यामधून धडा घेऊन जागतिक बँकेने एक समिती नेमली आहे. त्यामुळे विकास प्रकल्प राबविताना विकेंद्रित पद्धतीने नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे.सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा खर्च राज्य शासनच करणार आहे. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यही केले आहे.      मेधा पाटकर 

टॅग्स :PuneपुणेMedha Patkarमेधा पाटकरGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र