शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अवकाळी पावसामुळे कांद्याला आला 'भाव' ; दाेन वर्षातील उच्चांकी दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 19:40 IST

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

पुणे : यंदा पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर पडलेला ओला दुष्काळाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून रविवार (दि.३) रोजी कांद्याला मागील दोन वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. रविवारी कांदा-बटाटा विभागात कांद्याला ५५० ते ५८० रुपये प्रतिदहा किलोस दर मिळाला. मार्केटयार्डात १३० ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याची ११० ट्रक तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली.

यंदा परतीचा पाऊस लांबला असून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. कर्नाटक राज्यातही पाऊस सुरु आहे. मात्र जुना आणि चांगला दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यास कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याता परिणाम कांद्याच्या दरात वाढ हाेण्यामध्ये झाला. चांगल्या प्रतिच्या नवीन कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. जुन्या कांद्याचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला़.

चार दिवसांपासूनच दर वाढण्यास सुरुवातगेल्या चार दिवसांमध्ये दररोजच कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली.  बुधवारी ४०० रुपये, गुरुवारी ४५० रुपये शुक्रवारी ४८० ते ५०० रुपये आणि रविवारी ५८० रुपये प्रतिदहा किलोस भाव होता. रविवारी मिळालेला भाव हा गेल्या दोन वषार्तील उच्चांकी भाव आहे.

किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलोघाऊक बाजारात कांदा ५५ ते ५८ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मात्र किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते वाढीव दराने विक्री करत असल्याचेही ग्राहकांनी सांगितले.

चांगल्या दर्जांच्या कांद्याचा तुटवडाबाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रतिचा कांदा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथून मागणी वाढली आहे़ परिणामी कांद्याच्या भावात वाढ होत आहे. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे भाववाढ झाली आहे.- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी 

टॅग्स :PuneपुणेonionकांदाRainपाऊस