शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

By नितीन चौधरी | Updated: November 23, 2023 18:45 IST

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते

पुणे : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पेटले असून परिणामी राज्यातील साखर उत्पादन घटले आहे. एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. ऊसदराच्या आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात ६ लाख टनांची घट झाली आहे. 

राज्यातील ऊस गाळपहंगाम यंदा एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला मात्र, ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील काही साखर कारखाने अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी साखर उत्पादनही घटले आहे. गेल्या वर्षी राज्यात २३ नोव्हेंबरपर्यंत ९१ सहकारी व ९२ खाजगी असे १८३ कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी १६६ लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तर सरासरी साखर उतारा ८.४ टक्के होता. मात्र, यंदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७६ सहकारी व ७८ खासगी असे एकूण १५४ कारखाने सुरू होऊ शकले आहेत. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. सुरू झालेल्या कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊसगाळप केले असून त्यातून ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के मिळाला आहे. आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापूर विभागात १४ सहकारी व ८ खासगी कारखान्यांनी मिळून केवळ १४ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून १.१६ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलनGovernmentसरकारSocialसामाजिक