शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भीषण दुष्काळामुळे दौैंडकरांची पाण्यासाठी पायपीट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:41 IST

खडकवासला योजनेसाठी सुरू असलेला संघर्ष पेटणार

खोर : सध्या दौंड तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा तसेच पावसाच्या अभावामुळे या परिसरातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ, शेतकºयांनाही पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिसरात पडीक शेतीचे प्रमाण वाढले आहे.यामुळे शेतकºयांच्या मालाला नसलेला बाजारभावामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला असल्याचे सध्या या भागामधील चित्र आहे. यामध्ये दौंड तालुक्यातीलदक्षिण व पश्चिम भाग सर्वस्वी भरडला जात असतो. खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, हिंगणी, जिरेगाव, वासुंदे, रोटी, माळवाडी, नारायणबेट, भांडगाव या गावांचा यामध्ये जास्त जिरायती भाग म्हणून समावेश होतो. मात्र, या गावांना कायमस्वरूपाची पाण्याची उपाय योजना का होत नाही, हा मोठा व गहन प्रश्न सध्या पडत आहे.या गावांची संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून या जिरायती भागामधील गावांची कायमस्वरूपाची पाणीटंचाई संपवून या संदर्भातील आता ठोस पावले आगामी काळात उचलण्याची सध्याच्या स्थितीत गरज भासू लागली आहे. या भागामधील गावांचा दुष्काळ हटविण्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणून योग्य ती अंंमलबजावणी करणे गरजेचे आहे.एकीकडे खडकवासला योजनेच्या पाण्यावरून संघर्ष उपस्थित झाला असून, कालवेदेखील या पाण्याच्या संघषार्मुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खडकवासला धरणसाखळीत पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली या तालुक्यांतील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती ही आजच्या परिस्थितीत जळून जाण्याच्या मार्गावर आहे.दौंड तालुका हा जलसिंचनाच्या सुविधांंच्या बाबतीत जरी मागे असला, तरी ज्या भागामधून या तालुक्याला पाणी घ्यावे लागते, त्यामध्ये दौंडचा वाटा मोलाचा आहे. आज जनाई-शिरसाई ही पाण्याची योजना चालू आहे, यामध्ये सर्वांत मोठे श्रेय हे दौंड तालुक्याचे आहे. कारण जनाई-शिरसाई योजनेला लागणारे पाणी हे वरवंड (ता. दौंड) येथूनच उचलले जात असून, अशा या हक्काच्या पाण्यासाठीच या तालुक्यावर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.आपलेच पाणी आपल्यालाच विकत घेण्याची वेळ येत असेल, तर त्यासारखी कठीण व विचार करण्याजोगी दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. आजची परिस्थितीत पाहिली तर दौंड तालुक्याच्या उशाला दोन सिंचन योजना या कार्यान्वित आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर जलसिंचन उपसा योजना. मात्र, या दोन्ही योजना दौंड तालुक्याला शेतकरीवर्गाने पैसे भरले तरच वरदान ठरत आहेत. सध्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेती ही पाण्याच्या अभावामुळे ९५ टक्के पडीक असून शेतकºयांचे उपजीविकेचे साधन असलेली शेतीच ही पडीक राहिली असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक व उत्पन्नाची साधनेच बंद पडली आहेत.दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्याला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला, जनाई-शिरसाई योजना व पुरंदर योजना या योजनांच्या माध्यमातून दौंड तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी वेळोवेळी विधानसभेत, पाणी मीटिंगमध्ये हा प्रश्न उपस्थितीत केला असून त्यामधील या योजना सध्या दौंड तालुका दुष्काळमुक्तीच्या दिशेने पुढील आगामी काळात वाटचाल करेल, ही अपेक्षा या भागामधील जनता व शेतकरी वर्गाला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई