शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:52 IST

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा

बारामती : बारामती तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामस्थ अवर्षणग्रस्त स्थितीमुळे हिवाळ्यातच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. या वर्षी बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मिमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील तहानलेल्या २६ हजार ३१२ ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील १४ गावे १०३ वाड्यावस्त्यांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी, सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, गाडीखेल,वढाणे या गावांसह १०३ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुुरु आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १० टँकरच्या ४८ खेपा सुरु आहेत. ६ शासकीय,४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.

तालुक्यातील १४ गावांमधील ७ हजार २४५ लोकसंख्येला तर १७ हजार १२६ लोकसंख्येचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांपासून बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्री छत्रपती कारखाना परिसरात ऊसशेती नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे सध्या तरी जगली आहे. मात्र, जिरायती भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागांत सुरु आहेत. त्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ या गावांना मे महिन्यापासून, मोराळवाडी गावाला जून महिन्यापासून टँकर सुरू आहे.पिण्याच्या पाण्यापाठोपाठ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न आहे. चारा, पाणीटंचाईने शेतकºयांच्या दारातील जनावरांची दावण रिकामी होत आहे. उसाच्या ५० मोळ्या ३५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. पाचट, वाढ्यासह हा उसाचा दर आहे.४प्रत्यक्षात ३५०० रुपयांमध्ये शेतकºयांना ७०० ते ८०० किलो ऊस मिळत आहे. ऊसविक्री करणाºया व्यावसायिकांनी ऊसविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. हे व्यावसायिक यवत, केडगाव, भांडगाव, नाझरे भागातून ऊस आणुन विक्री करण्यात येत आहे. कारखान्याच्या गाळपासाठी असलेला ऊस जनावरांच्या चाºयासाठी जात असल्याने गळीत हंगामावर त्याचा परीणाम होणार आहे.जनावरांसाठी मका पिकाची उपलब्धता नसल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मका पिकाऐवजी उसाचा खाद्यात समावेश झाल्याने हा परिणाम झाला आहे. माझ्याकडे तीन गायींचे प्रतिदिन ३२ लिटर दूध उत्पादन होते. तेच उत्पादन प्रतिदिन १० लीटरने घटले असल्याचे बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथील शेतकरी विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळBaramatiबारामतीPuneपुणे