शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:52 IST

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा

बारामती : बारामती तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामस्थ अवर्षणग्रस्त स्थितीमुळे हिवाळ्यातच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. या वर्षी बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मिमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील तहानलेल्या २६ हजार ३१२ ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील १४ गावे १०३ वाड्यावस्त्यांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी, सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, गाडीखेल,वढाणे या गावांसह १०३ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुुरु आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १० टँकरच्या ४८ खेपा सुरु आहेत. ६ शासकीय,४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.

तालुक्यातील १४ गावांमधील ७ हजार २४५ लोकसंख्येला तर १७ हजार १२६ लोकसंख्येचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांपासून बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्री छत्रपती कारखाना परिसरात ऊसशेती नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे सध्या तरी जगली आहे. मात्र, जिरायती भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागांत सुरु आहेत. त्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ या गावांना मे महिन्यापासून, मोराळवाडी गावाला जून महिन्यापासून टँकर सुरू आहे.पिण्याच्या पाण्यापाठोपाठ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न आहे. चारा, पाणीटंचाईने शेतकºयांच्या दारातील जनावरांची दावण रिकामी होत आहे. उसाच्या ५० मोळ्या ३५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. पाचट, वाढ्यासह हा उसाचा दर आहे.४प्रत्यक्षात ३५०० रुपयांमध्ये शेतकºयांना ७०० ते ८०० किलो ऊस मिळत आहे. ऊसविक्री करणाºया व्यावसायिकांनी ऊसविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. हे व्यावसायिक यवत, केडगाव, भांडगाव, नाझरे भागातून ऊस आणुन विक्री करण्यात येत आहे. कारखान्याच्या गाळपासाठी असलेला ऊस जनावरांच्या चाºयासाठी जात असल्याने गळीत हंगामावर त्याचा परीणाम होणार आहे.जनावरांसाठी मका पिकाची उपलब्धता नसल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मका पिकाऐवजी उसाचा खाद्यात समावेश झाल्याने हा परिणाम झाला आहे. माझ्याकडे तीन गायींचे प्रतिदिन ३२ लिटर दूध उत्पादन होते. तेच उत्पादन प्रतिदिन १० लीटरने घटले असल्याचे बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथील शेतकरी विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळBaramatiबारामतीPuneपुणे