शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम  ; परदेशगमनावर आली बंधने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:30 IST

हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्या

ठळक मुद्देयुरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल

पुणे : कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रावर दिसून येत आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर मर्यादा आणली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून घरून काम करण्याचा पर्यायदेखील दिला आहे. ‘आयटी’ची राज्याची राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. देशातील आयटीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याचा लौकिक आहे. हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी कामासाठी जगभर प्रवास करीत असतात.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर निर्बंध आले आहेत. युरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल केला आहे. नियोजित परिषदा, बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. यांसारख्या कारणांमुळे पुण्यातल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या परदेशगमनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुण्यातल्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासून घ्यावयाची दक्षता, स्वच्छतेचे उपाय याची माहिती देण्यात येत आहे. काय करावे आणि काय करू नये, याच्या सूचना प्रत्येकाला ई-मेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कंपन्यांमधले सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, घरून काम करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला आहे. याबाबत सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर असोसिएशनच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘आमच्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.’’ ............................पर्याय हातात ठेवावा लागेल : प्रदीप भार्गव‘‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल आणि रसायन उद्योग काहीसा प्रभावित झाला आहे. मात्र कोणत्याही कंपनीतले काम कच्च्या मालाअभावी ठप्प झालेले नाही. या साथीमुळे कोणत्याही एका देशावर अथवा पुरवठादारावर अवलंबून न राहण्याचा धडा मिळाला आहे. चीनमधे वुहान सोडल्यास इतर ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन सुरू झाले आहे. तसेच, तेथून काही जहाजे रवानादेखील झाली आहेत. दोन ते तीन आठवड्यांत माल येईल. इलेक्ट्रॉनिक, रसायने यातून विषाणूचा प्रसार होत नसल्याने तसा धोका नाही,’’ असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सांगितले. 000

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यEmployeeकर्मचारी