शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम  ; परदेशगमनावर आली बंधने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:30 IST

हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्या

ठळक मुद्देयुरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल

पुणे : कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रावर दिसून येत आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर मर्यादा आणली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून घरून काम करण्याचा पर्यायदेखील दिला आहे. ‘आयटी’ची राज्याची राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. देशातील आयटीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याचा लौकिक आहे. हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी कामासाठी जगभर प्रवास करीत असतात.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर निर्बंध आले आहेत. युरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल केला आहे. नियोजित परिषदा, बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. यांसारख्या कारणांमुळे पुण्यातल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या परदेशगमनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुण्यातल्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासून घ्यावयाची दक्षता, स्वच्छतेचे उपाय याची माहिती देण्यात येत आहे. काय करावे आणि काय करू नये, याच्या सूचना प्रत्येकाला ई-मेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कंपन्यांमधले सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, घरून काम करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला आहे. याबाबत सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर असोसिएशनच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘आमच्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.’’ ............................पर्याय हातात ठेवावा लागेल : प्रदीप भार्गव‘‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल आणि रसायन उद्योग काहीसा प्रभावित झाला आहे. मात्र कोणत्याही कंपनीतले काम कच्च्या मालाअभावी ठप्प झालेले नाही. या साथीमुळे कोणत्याही एका देशावर अथवा पुरवठादारावर अवलंबून न राहण्याचा धडा मिळाला आहे. चीनमधे वुहान सोडल्यास इतर ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन सुरू झाले आहे. तसेच, तेथून काही जहाजे रवानादेखील झाली आहेत. दोन ते तीन आठवड्यांत माल येईल. इलेक्ट्रॉनिक, रसायने यातून विषाणूचा प्रसार होत नसल्याने तसा धोका नाही,’’ असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सांगितले. 000

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यEmployeeकर्मचारी