शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:38 IST

सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे प्रस्तावित विमानतळ व त्यासाठी होणारे भूसंपादन हे उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी असून, पालकमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ब्रम्हदेव आला तरी विमानतळपुरंदरलाच होणार असे सांगत आहे. मात्र, तुम्ही ब्रम्हदेवाचे नाव घेऊन तुम्हाला घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होऊ देऊ नका. उद्योगपती अदानीच्या होऊ घातलेल्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल तर बारामतीला विमानतळ का करीत नाही? अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

वनपुरी (ता. पुरंदर) येथे विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्यावतीने विरोध करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रय झुरंगे, पी. एस. मेमाणे, नीरा बाजार समितीचे संचालक महादेव टिळेकर, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, खानवडीच्या स्वप्नाली होले, पारगावच्या ज्योती मेमाणे, तात्यासाहेब मगर, सतीश कुंभारकर, रामदास कुंभारकर, चेतन मेमाणे, संतोष कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, ॲड. संजय कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर तसेच वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, कुंभारवळण या गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, आपले संसार, तरुण पिढी वाचवण्यासाठी आपल्याला जमीन जपली पाहिजे. सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करायची त्यांची नीती असल्याने सर्वांनी एकजूट कायम ठेवा. आपली घरे, जमीन वाचविण्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे.

बैठकीला उपस्थित राहू नका

शासकीय अधिकारी आपल्या गावात येतील, आपल्याशी गोड बोलून सह्या घेतील, त्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे अधिकारी कितीही आपल्या गावात आले आणि कितीही विनंत्या केल्या तरी कोणीही उपस्थित राहू नका. विमानतळ करण्याची काही लोकांची मानसिकता असली तरी आपण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. विमानतळाचे फायदे सांगितले जात आहेत, तोटे सांगितले जात नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींचा सर्वांनी विचार केला पाहिजे. एकदा हाक दिल्यावर सर्वांनी एकाच वेळी उभे राहिल्यास प्रकल्प माघारी जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास निवृत्त शिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBaramatiबारामती