शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
5
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
6
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
7
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
8
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
10
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
11
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
12
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
13
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
14
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
15
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
16
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
17
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
18
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
19
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
20
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:38 IST

सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे प्रस्तावित विमानतळ व त्यासाठी होणारे भूसंपादन हे उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी असून, पालकमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ब्रम्हदेव आला तरी विमानतळपुरंदरलाच होणार असे सांगत आहे. मात्र, तुम्ही ब्रम्हदेवाचे नाव घेऊन तुम्हाला घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होऊ देऊ नका. उद्योगपती अदानीच्या होऊ घातलेल्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल तर बारामतीला विमानतळ का करीत नाही? अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

वनपुरी (ता. पुरंदर) येथे विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्यावतीने विरोध करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रय झुरंगे, पी. एस. मेमाणे, नीरा बाजार समितीचे संचालक महादेव टिळेकर, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, खानवडीच्या स्वप्नाली होले, पारगावच्या ज्योती मेमाणे, तात्यासाहेब मगर, सतीश कुंभारकर, रामदास कुंभारकर, चेतन मेमाणे, संतोष कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, ॲड. संजय कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर तसेच वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, कुंभारवळण या गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, आपले संसार, तरुण पिढी वाचवण्यासाठी आपल्याला जमीन जपली पाहिजे. सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करायची त्यांची नीती असल्याने सर्वांनी एकजूट कायम ठेवा. आपली घरे, जमीन वाचविण्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे.

बैठकीला उपस्थित राहू नका

शासकीय अधिकारी आपल्या गावात येतील, आपल्याशी गोड बोलून सह्या घेतील, त्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे अधिकारी कितीही आपल्या गावात आले आणि कितीही विनंत्या केल्या तरी कोणीही उपस्थित राहू नका. विमानतळ करण्याची काही लोकांची मानसिकता असली तरी आपण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. विमानतळाचे फायदे सांगितले जात आहेत, तोटे सांगितले जात नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींचा सर्वांनी विचार केला पाहिजे. एकदा हाक दिल्यावर सर्वांनी एकाच वेळी उभे राहिल्यास प्रकल्प माघारी जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास निवृत्त शिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBaramatiबारामती