शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:38 IST

सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारे प्रस्तावित विमानतळ व त्यासाठी होणारे भूसंपादन हे उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी असून, पालकमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ब्रम्हदेव आला तरी विमानतळपुरंदरलाच होणार असे सांगत आहे. मात्र, तुम्ही ब्रम्हदेवाचे नाव घेऊन तुम्हाला घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होऊ देऊ नका. उद्योगपती अदानीच्या होऊ घातलेल्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल तर बारामतीला विमानतळ का करीत नाही? अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

वनपुरी (ता. पुरंदर) येथे विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्यावतीने विरोध करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रय झुरंगे, पी. एस. मेमाणे, नीरा बाजार समितीचे संचालक महादेव टिळेकर, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, खानवडीच्या स्वप्नाली होले, पारगावच्या ज्योती मेमाणे, तात्यासाहेब मगर, सतीश कुंभारकर, रामदास कुंभारकर, चेतन मेमाणे, संतोष कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, ॲड. संजय कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर तसेच वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, कुंभारवळण या गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, आपले संसार, तरुण पिढी वाचवण्यासाठी आपल्याला जमीन जपली पाहिजे. सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जाती धर्मात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करायची त्यांची नीती असल्याने सर्वांनी एकजूट कायम ठेवा. आपली घरे, जमीन वाचविण्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे.

बैठकीला उपस्थित राहू नका

शासकीय अधिकारी आपल्या गावात येतील, आपल्याशी गोड बोलून सह्या घेतील, त्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे अधिकारी कितीही आपल्या गावात आले आणि कितीही विनंत्या केल्या तरी कोणीही उपस्थित राहू नका. विमानतळ करण्याची काही लोकांची मानसिकता असली तरी आपण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. विमानतळाचे फायदे सांगितले जात आहेत, तोटे सांगितले जात नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींचा सर्वांनी विचार केला पाहिजे. एकदा हाक दिल्यावर सर्वांनी एकाच वेळी उभे राहिल्यास प्रकल्प माघारी जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास निवृत्त शिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBaramatiबारामती