शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अवघे १०५ वयमान : शतायुषी डॉ बळवंत घाटपांडे सांगत आहेत शतकाचा अनुभव (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 10:23 PM

डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे.

पुणे :डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणि मुख्य म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार या सूत्रीच्या आधारावर ते आजही निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. शतकाचा बदल अनुभलेले डॉ घाटपांडे आजही दवाखान्यात नियमित येऊन रुग्णांची तपासणी करतात. कोणच्याही मदतीशिवाय चालणारी त्यांची ही दिनचर्या विशेषच मानायला हवी. 

घाटपांडे यांचा जन्म जुन्नरजवळील आळे गावातला. लहानपणी डॉक्टर बनण्याचा निश्चय केल्यावर त्यांनी तो प्रचंड चिकाटीने अमलात आणला. त्यात तीनवेळा अपयश आल्यावरही त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि मागील ८२ वर्षे त्यांचीरुग्णसेवा अविरतपणे सुरु आहे. नव्या काळातले तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत जुन्याचा ऋणानुबंधही त्यांनी तोडला नाही . काहीही झालं तरी रोज अर्धा तास व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत करण्यास ते विसरत नाहीत. त्याशिवाय साधे, सात्विक जेवण घेताना अर्धा लिटर दुधही ते पितात. घाटपांडे यांना तीन मुले असून तिघेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत. या सगळ्यांशी गप्पा मारायला, त्यांची नियमित चौकशी करायला ते विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या रुग्णांसह सगळ्यांना ते हवेहवेसे वाटतात. रुग्णांच्या तर तीन पिढ्याही त्यांनी तपासल्या आहेत. घाटपांडे यांची पदवीही वेगळी असून ती एल. सी. पी. एस. अशी आहे. याचे पूर्ण रूप लायसन्स इन मेडिकल प्रॅक्टिस अँड सर्जरी असल्याचे ते सांगतात. पुण्यात अभ्यास करून मुंबईत परीक्षा देऊन त्यांनी ही पदवी मिळवली. 

     बदलेला काळ, झालेले बदल याविषयी त्यांची काही मते आहेत. ते म्हणतात, ''गेल्या १००वर्षात समाज घडलाही आणि बिघडालाही. आता आजार वाढले तशा डॉक्टरांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. मात्र रुग्णांना बर करायला नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जगणं सोपं झालं आहे. समाजात मात्र पूर्वी जो सलोखा, एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, जिव्हाळा होता तो आता लोप पावला आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत तरी जुने ते सोने म्हणून नाती जपायला हवीत''

गांधी हत्या आणि पानशेतपूर स्मरणात 

आयुष्यातल्या दोन महत्वाच्या आठवणी विचारल्यावर डॉ. घाटपांडे काहीसे खिन्न होतात. १९४८साली झालेली गांधीहत्या आणि १०६१साली पानशेतच्या पूराच्या आठवणी कधीही विसरू शकत नसल्याचे ते म्हणतात . संपलेले पुणे आणि घरादाराची राखरांगोळी आजही अंगावर काटा उभा राहत असल्याचे ते सांगतात. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टर