शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अवघे १०५ वयमान : शतायुषी डॉ बळवंत घाटपांडे सांगत आहेत शतकाचा अनुभव (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 09:25 IST

डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे.

पुणे :डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणि मुख्य म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार या सूत्रीच्या आधारावर ते आजही निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत आहेत. शतकाचा बदल अनुभलेले डॉ घाटपांडे आजही दवाखान्यात नियमित येऊन रुग्णांची तपासणी करतात. कोणच्याही मदतीशिवाय चालणारी त्यांची ही दिनचर्या विशेषच मानायला हवी. 

घाटपांडे यांचा जन्म जुन्नरजवळील आळे गावातला. लहानपणी डॉक्टर बनण्याचा निश्चय केल्यावर त्यांनी तो प्रचंड चिकाटीने अमलात आणला. त्यात तीनवेळा अपयश आल्यावरही त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि मागील ८२ वर्षे त्यांचीरुग्णसेवा अविरतपणे सुरु आहे. नव्या काळातले तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत जुन्याचा ऋणानुबंधही त्यांनी तोडला नाही . काहीही झालं तरी रोज अर्धा तास व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत करण्यास ते विसरत नाहीत. त्याशिवाय साधे, सात्विक जेवण घेताना अर्धा लिटर दुधही ते पितात. घाटपांडे यांना तीन मुले असून तिघेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत. या सगळ्यांशी गप्पा मारायला, त्यांची नियमित चौकशी करायला ते विसरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या रुग्णांसह सगळ्यांना ते हवेहवेसे वाटतात. रुग्णांच्या तर तीन पिढ्याही त्यांनी तपासल्या आहेत. घाटपांडे यांची पदवीही वेगळी असून ती एल. सी. पी. एस. अशी आहे. याचे पूर्ण रूप लायसन्स इन मेडिकल प्रॅक्टिस अँड सर्जरी असल्याचे ते सांगतात. पुण्यात अभ्यास करून मुंबईत परीक्षा देऊन त्यांनी ही पदवी मिळवली. 

     बदलेला काळ, झालेले बदल याविषयी त्यांची काही मते आहेत. ते म्हणतात, ''गेल्या १००वर्षात समाज घडलाही आणि बिघडालाही. आता आजार वाढले तशा डॉक्टरांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. मात्र रुग्णांना बर करायला नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जगणं सोपं झालं आहे. समाजात मात्र पूर्वी जो सलोखा, एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, जिव्हाळा होता तो आता लोप पावला आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत तरी जुने ते सोने म्हणून नाती जपायला हवीत''

गांधी हत्या आणि पानशेतपूर स्मरणात 

आयुष्यातल्या दोन महत्वाच्या आठवणी विचारल्यावर डॉ. घाटपांडे काहीसे खिन्न होतात. १९४८साली झालेली गांधीहत्या आणि १०६१साली पानशेतच्या पूराच्या आठवणी कधीही विसरू शकत नसल्याचे ते म्हणतात . संपलेले पुणे आणि घरादाराची राखरांगोळी आजही अंगावर काटा उभा राहत असल्याचे ते सांगतात. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टर