शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

डाळभात दिल्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड, आरोपीस पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:16 IST

आरोपीस पुण्यातून अटक । व्यवस्थापक बाहेरून मागवायचा चांगले जेवण

मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका बारमधील दोघा कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. बारचा व्यवस्थापक चांगले जेवण मागवून खात असे व आरोपीस मात्र डाळभात द्यायचा. यावरून भांडण होऊन मारहाण केल्याच्या रागातून त्याने दोघांची झोपतच हत्या केल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे .

मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी बारमध्ये राहणारा बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी (४८) व सफाईकामगार नरेश पंडित (५२) यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारच्या पाण्याच्या टाकीत टाकले. गुरुवारी बारमालक गंगाधर पय्याडे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हत्याकांड उघड झाले. बार लॉकडाऊन काळात बंद असल्याने शेट्टी, पंडित सह कल्लू राजू यादव (३५) असे तिघेच बारमध्ये रहात होते. यादव हा बारमध्ये नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी तपास सुरु केला. मीरा रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मिळून शोधमोहीम हाती घेतली व त्यासाठी काही पथके तयार केली.तांत्रिक विश्लेषणच्या आधारे पोलीस पथकाने कल्लू याला शुक्र वारी रात्री पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील साजन बारमधून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत कल्लू याने ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना व्यवस्थापक शेट्टी हा अन्य हॉटेलमधून चांगले जेवण मागवून खात असे. परंतु कल्लूला डाळभातच देत असे. या भांडणातूनच शेट्टी व पंडितने कल्लूला मारहाण केली होती.यापूर्वीही गुन्हे दाखलभांडणाचा राग आल्याने सूड घेण्यासाठी कल्लूने १ जून रोजी रात्री शेट्टी व पंडित झोपलेले असताना फावड्याने वार करून हत्या केली . त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिले व तो पसार झाला. दोघांचे मोबाइल कल्लूने जाताना सोबत नेले होते. कल्लूवर कोलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल असून पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातही मारामारीचा गुन्हा दाखल आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कल्लू याने शेट्टीच्या मोबाइलवरुन दोघांची हत्या केल्याची माहिती नालासोपारा आणि पनवेल येथील नातोवाईकांना दिली. कोलकत्ता येथे त्याच्यावर दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येचा गुन्हाही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून