शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

पुणे-सातारा रस्त्याने प्रवास नको रे बाबा! जागोजागी खड्डे, वाहनांच्या टायर फुटण्याच्या अनेक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 14:17 IST

खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावर डांबरी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या धारदार कडांमुळे अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांचे रात्री अपरात्री खड्डा न कळल्यामुळे टायर फुटून अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील या उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला ३० ते ४० वाहनांचे टायर फुटल्यामुळे आणि जवळ कुठेही टायर दुरुस्ती अथवा बदलण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत.

धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावरील या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे. वाहनांचे नुकसान आणि वाढणारा वेळ यामुळे या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. धांगवडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील हे खड्डे कधी बुजवणार की मोठा अपघात होण्याची वाट पाहिली जाते आहे अशी टीका करीत अनेक प्रवासी या रस्त्यावरून आता इकडून यायचेच नाही अशी उपरोधिक टोमणे मारत आहेत.             उड्डाणपुलावरील या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. पुणे - सातारा - कोल्हापूर - महाबळेश्वर या रस्त्याला नेहमी रहदारी असते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दररोज अपघात होत आहेत. येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजाराचे दुखणे वाढले आहे.

खराब रस्त्याअभावी वाहने पंक्चर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्षरश: धास्तावले आहेत. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. तरीही नाईलाजाने याच महामार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या दुरुस्तीअभावी शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी येथील काळूराम महांगरे आणि प्रवासी, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार आदींनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका