शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुणे-सातारा रस्त्याने प्रवास नको रे बाबा! जागोजागी खड्डे, वाहनांच्या टायर फुटण्याच्या अनेक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 14:17 IST

खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावर डांबरी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या धारदार कडांमुळे अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांचे रात्री अपरात्री खड्डा न कळल्यामुळे टायर फुटून अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील या उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला ३० ते ४० वाहनांचे टायर फुटल्यामुळे आणि जवळ कुठेही टायर दुरुस्ती अथवा बदलण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत.

धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावरील या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे. वाहनांचे नुकसान आणि वाढणारा वेळ यामुळे या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. धांगवडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील हे खड्डे कधी बुजवणार की मोठा अपघात होण्याची वाट पाहिली जाते आहे अशी टीका करीत अनेक प्रवासी या रस्त्यावरून आता इकडून यायचेच नाही अशी उपरोधिक टोमणे मारत आहेत.             उड्डाणपुलावरील या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. पुणे - सातारा - कोल्हापूर - महाबळेश्वर या रस्त्याला नेहमी रहदारी असते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दररोज अपघात होत आहेत. येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजाराचे दुखणे वाढले आहे.

खराब रस्त्याअभावी वाहने पंक्चर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्षरश: धास्तावले आहेत. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. तरीही नाईलाजाने याच महामार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या दुरुस्तीअभावी शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी येथील काळूराम महांगरे आणि प्रवासी, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार आदींनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका