शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Pune: पुण्यात रात्रीची ड्रायव्हिंग नकाे रे बाबा! रात्री सर्वाधिक प्राणघातक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 09:38 IST

पुणे शहरात सर्वाधिक प्राणघातक अपघात रात्री ११ ते पहाटे १ याच दरम्यान झाले आहेत....

पुणे : रुंदीकरणामुळे प्रशस्त झालेले आणि सिमेंटचे रस्ते... रात्रीची वेळ असल्याने सिग्नल बंद आणि वाहनांची संख्या तुरळक...अशावेळी वाहनांचा वेग वाढतो आणि चालकाचे नियंत्रण सुटून प्राणघातक अपघात होतात. हेच वाहतूक पाेलिसांच्या विश्लेषणातून समाेर आले असून, पुणे शहरात सर्वाधिक प्राणघातक अपघात रात्री ११ ते पहाटे १ याच दरम्यान झाले आहेत.

पुणे पोलिसांच्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. पुणे पोलिस आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या व्हायटल स्टॅटेजीजच्या तांत्रिक सहयोगाने वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना दुष्परिणामाबाबत चेतावनी देणारी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना दुष्परिणामांबद्दल इशारा देणारी मोहीम सुरू केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. पुढील चार आठवडे ही माेहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व सिनेमागृहात ३० सेकंदांची एक चित्रफीत दाखवण्यात येणार आहे.

जीवघेणे अपघाताची वेळ काय?

शहरात २०२२ मध्ये झालेल्या अपघातांत एकूण ३२७ जणांचा मृत्यू झाला. यात ७५ मृत्यू हे रात्री ११ ते १ च्या दरम्यानच्या अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असतो. त्यामुळे अजाणतेपणे वाहनांचा वेग वाढतो. त्यात अनेकदा रस्त्यांमध्ये अचानक अडथळा, खड्डे अशा वेगवेगळ्या कारणामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.

यंदा अपघातात वाढ :

यावर्षी १ जानेवारी ते २२ नोव्हेंबर दरम्यान पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १०७७ अपघात झाले. त्यात २९३ प्राणघातक अपघातात ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५४० गंभीर अपघात झाले असून, त्यात ६०६ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १३० अपघातामध्ये १६३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ११४ अपघातात विनादुखापतीची नोंद झाली आहे.

पुणे शहरातील अपघात २०२२

एकूण अपघात - ९७८

प्राणघातक अपघात - ३०९

एकूण मृत्यू - ३२७

पादचारी मृत्यू - १०६

दुचाकीस्वाराचा मृत्यू - १८७

कार पॅसेंजर मृत्यू - ८

इतर मृत्यू - २६                                                                        

रात्री ११ ते १ मध्ये मृत्यू - ७५

गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील वाहनांचा वेग हा प्राणघातक आणि गंभीर दुखापतींसाठी कारण ठरत आहे. रस्ते अपघातात आलेला अचानक मृत्यू हे कुटुंबाला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अपंग करत असतात.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

रस्ते रिकामे असतात तेव्हा वाहनांचा वेग वाढतो आणि अपघात होतात. यामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांचा वेग कमी करण्याचे ध्येय आहे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक)

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात