शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जाती-पातीचे, धर्माचे राजकारण करू नका: दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:53 IST

प्रमुख संतांचा जो विचार आहे तो आचरणात आणला पाहिजे, असे मत माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले

निरगुडसर : संतांनी दिलेला समतेचा विचार लक्षात घेऊन कुठल्याही जाती-पातीचे, धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, हा प्रमुख संतांचा जो विचार आहे तो आचरणात आणला पाहिजे, असे मत माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.निरगुडसर ता. (आंबेगाव) येथे आयोजित निरगुडेश्वर मंदिर व दत्त मंदिर कलशारोहण व प्राणप्रतिष्ठान सोहळा कार्यक्रम प्रसंगी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता कीर्तन सोहळा ह.भ.प कबीर महाराज यांच्या हरी किर्तनाने पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले निरगुडसर गावामध्ये असतील किंवा इतरही गावांमध्ये लोकसहभागामधूनची कामे होतात, ती कामे झाली पाहिजेत. सर्व गावातील लोकांनी, तरुणांनी गावातील धार्मिक किंवा सांस्कृतिक-संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी श्री निरगुडेश्वर आणि श्रीदत्त महाराज मूर्ती यांची ग्रामप्रदक्षिणा व मंदिर कलश मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीत कलशधारी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. निरगुडेश्वर मंदिर मुख्य चौक ते बस स्थानक मार्गे पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक सहभागी झाले होते. तसेच, महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली होती. अनेकांनी फुगड्या खेळत आनंद लुटला, महिलांनी घरासमोर रांगोळी काढली होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील