शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जाती-पातीचे, धर्माचे राजकारण करू नका: दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:53 IST

प्रमुख संतांचा जो विचार आहे तो आचरणात आणला पाहिजे, असे मत माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले

निरगुडसर : संतांनी दिलेला समतेचा विचार लक्षात घेऊन कुठल्याही जाती-पातीचे, धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, हा प्रमुख संतांचा जो विचार आहे तो आचरणात आणला पाहिजे, असे मत माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.निरगुडसर ता. (आंबेगाव) येथे आयोजित निरगुडेश्वर मंदिर व दत्त मंदिर कलशारोहण व प्राणप्रतिष्ठान सोहळा कार्यक्रम प्रसंगी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता कीर्तन सोहळा ह.भ.प कबीर महाराज यांच्या हरी किर्तनाने पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले निरगुडसर गावामध्ये असतील किंवा इतरही गावांमध्ये लोकसहभागामधूनची कामे होतात, ती कामे झाली पाहिजेत. सर्व गावातील लोकांनी, तरुणांनी गावातील धार्मिक किंवा सांस्कृतिक-संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी श्री निरगुडेश्वर आणि श्रीदत्त महाराज मूर्ती यांची ग्रामप्रदक्षिणा व मंदिर कलश मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीत कलशधारी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. निरगुडेश्वर मंदिर मुख्य चौक ते बस स्थानक मार्गे पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक सहभागी झाले होते. तसेच, महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली होती. अनेकांनी फुगड्या खेळत आनंद लुटला, महिलांनी घरासमोर रांगोळी काढली होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील