शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:33 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत

पुणे: निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे, यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस कडू उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. कडू म्हणाले, आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, जो शेतकरीविरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री असोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नाही.

परभणीत एका शेतकरी पती - पत्नीने आत्महत्या केली, त्यासंदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली आणि ते कळल्यानंतर गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. कोणी तरी महिला भगिनीने तेथे जाऊन यावे, यासाठी सुप्रिया सुळे यांना मी फोन करणार होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. पैसा नाही व कर्ज आहे म्हणून आत्महत्या होणे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही कडू म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार