शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:33 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत

पुणे: निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे, यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस कडू उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. कडू म्हणाले, आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, जो शेतकरीविरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री असोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नाही.

परभणीत एका शेतकरी पती - पत्नीने आत्महत्या केली, त्यासंदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली आणि ते कळल्यानंतर गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. कोणी तरी महिला भगिनीने तेथे जाऊन यावे, यासाठी सुप्रिया सुळे यांना मी फोन करणार होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. पैसा नाही व कर्ज आहे म्हणून आत्महत्या होणे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही कडू म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार