शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:33 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत

पुणे: निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे, यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस कडू उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. कडू म्हणाले, आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, जो शेतकरीविरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री असोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नाही.

परभणीत एका शेतकरी पती - पत्नीने आत्महत्या केली, त्यासंदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली आणि ते कळल्यानंतर गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. कोणी तरी महिला भगिनीने तेथे जाऊन यावे, यासाठी सुप्रिया सुळे यांना मी फोन करणार होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. पैसा नाही व कर्ज आहे म्हणून आत्महत्या होणे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही कडू म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार