शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:33 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत

पुणे: निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे, यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस कडू उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. कडू म्हणाले, आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, जो शेतकरीविरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री असोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नाही.

परभणीत एका शेतकरी पती - पत्नीने आत्महत्या केली, त्यासंदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली आणि ते कळल्यानंतर गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. कोणी तरी महिला भगिनीने तेथे जाऊन यावे, यासाठी सुप्रिया सुळे यांना मी फोन करणार होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. पैसा नाही व कर्ज आहे म्हणून आत्महत्या होणे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही कडू म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार